शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठे तहानलेलेच !

By admin | Updated: August 19, 2015 01:48 IST

सिंदखेडराजा तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे ढग कायमच.

अशोक इंगळे /सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प पावसाअभावी कोरडे पडले असून, सर्वांनाच दमदार पावसाची गरज आहे. तब्बल अडीच महिने लोटूनही नदी, नाले वाहिले नाही. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे ढग कायम आहेत. चार गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून, काही गावे भीषण पाणी टंचाईच्या कचाट्यात येत आहेत.साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात यावर्षी सुरुवातीपासून पावसाने उघडझाप सुरु ठेवली. खरीप हंगामातील पिकं या पावसाने जगत असली तरी फुलं आणि फळधारणेत आलेल्या पिकाला पावसाची नितांत गरज आहे. रिमझिम पावसावर पिके तग धरुन आहेत; परंतु धरणे, तलाव यासाठी दमदार पावसाची गरज आहे. साखरखेर्डा भागात १५0 मिमीपर्यंत पाऊस पडला असून, गायखेडी तलाव, महालक्ष्मी तलाव, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, सावंगी माळी - १ आणि - २ या तलावात कोठेही पाणीसाठा नाही. शेंदुर्जन मंडळात जागदरी तलावात मृतसाठा शिल्लक असून, हनवतखेड, हिवरा गडलिंग येथील दोन्ही मध्यम प्रकल्प कोरडी पडली आहेत. त्यामुळे मलकापूर पांग्रा आणि दरेगाव या दोन्ही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. मलकापूर पांग्रा मंडळात १00.00 मिमीसुद्धा पाऊस पडला नसल्याने सर्वच छोटी तलाव कोरडी आहेत. दुसरबीड मंडळात १८0.00 मिमी पाऊस पडला असला तरी केशव शिवणी, मांडवा, जऊळका तलावात फक्त मृतसाठा असून, १५ दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. सोनोशी मंडळात २00 मिमी पाऊस झाला. या परिसरात जांभोरा, ताडशिवणी, रुम्हणा, सोनोशी, बुट्टा तांडा, विझोरा, चांगेफळ यासह २५ गावाचा पाणीपुरवठा विद्रुपा धरणावरून होतो; परंतु मराठवाड्यात आजपर्यंत कोठेही दमदार पाऊस न पडल्याने पाणी टंचाईचे संकट आले. किनगावराजा मंडळातही परिस्थिती फारशी चांगली नाही. सिंदखेडराजा परिसरातही पाहिजे तसा पाऊस नाही. त्यामुळे चांदणी तलाव, मोती तलाव कोरडेच आहेत. ज्या गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. त्या उमरद, सोनोशी, मलकापूर पांग्रा, पिंपळखुटा, दरेगाव, केशव शिवणी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १२ गावात विहीर अधिग्रहण आहे. काही गावात आठवड्यातून एक दिवस पाणी सोडण्यात येते. साखरखेर्डा, सिंदखेडराजा येथे महिन्यातून एकवेळा पाणीपुरवठा होतो. तर साखरखेर्डा येथे गढूळ पाणी पाणीपुरवठा होत असून, ६-६ महिने पाण्याची टाकी स्वच्छ केल्या जात नाही. त्यामुळे मिळेल त्या पाण्यावर जनतेला दिवस काढण्याची वेळ आली आहे.