शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

बाबासाहेबांच्या परिसस्पर्शाची स्मृती कायम

By admin | Updated: April 14, 2015 00:49 IST

बाबासाहेबांची बुलडाणा जिल्हा भेट दलितांमध्ये नवी चेतना भरणारी.

बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात २0 मार्च १९२७ रोजी शेकडो अस्पृश्यांनी महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन तळ्याचे पाणी प्राशन केले व तत्कालीन प्रतिगामी, विषम, अन्यायी व्यवस्थेला आव्हान दिले. अस् पृश्यांना सार्वजनिक पाणवठे खुले करून देण्याचा तो समता संगर होता. हा सत्याग्रह केवळ पाण्याचा नसून, अस्पृश्य हे देखील माणसं आहेत, हे सिद्ध करण्याकरिता व समतेची मुहूर्तमेढ रोवून त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची तयारी बाबासाहेबांनी सुरू केली होती. त्यासाठी ठिकठिकाणी सभा घेऊन उद्दिष्टे समाजावून सांगितल्या जाऊ लागले. याच पृष्ठभूमीवर बाबासाहेब बुलडाणा जिल्ह्याच्या भेटीवर आले असता त्यांनी दलितांमध्ये नवी चेतना भरण्याचे काम केले.२९ मे १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे आले, त्यांनी पातुर्डा येथील विहीर खुली करून दिली. त्यांची ही पातुर्डा भेट केवळ एक घटना नसून, ती एक चळवळीतील ऐतिहासिक नोंद होती. बाबासाहेबांच्या आगमनाने जिल्ह्यातील दलित चळवळीला उभारी मिळाली. या भेटीनंतर अनेक कार्यकर्त्यांंनी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९२९ च्या पातुर्डा भेटीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुढे २६ मार्च १९३४ ला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आल्याची नोंद आहे. मलकापूर येथील अस्पृश्य महिलांच्या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संबोधित केले होते. मलकापूर येथील सार्वजनिक वाचनालयाच्या ऐतिहासिक मैदानावर येथील मडकेबुवा जाधव यांनी महिलांची ही परिषद भरविली होती. या परिषदेनंतर मडकेबुवा जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी बाबासाहेबांच्या चळवळीची धुरा खांद्यावर घेऊन ते जिल्हाभर जनजागृती करीत फिरत होते.१४ आक्टोबर १९५६ च्या नागपूर येथील पहिल्या धर्मांंतर सोहळ्यानंतर दुसरा धर्मांंतर सोहळा चंद्रपूर येथे झाला. तर तिसरा ऐतिहासिक धर्मांंतर सोहळा बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री या गावात घेण्याचा बहुमान मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी बॅ. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात ५0 हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत हा धर्मांंतर सोहळा पार पडला होता. सारा भारत बौद्धमय करेल हे बाबासाहेबांचे स्वप्न तडीस नेण्यासाठी तत्कालीन त्यांचे सहकारी यांनी विदर्भ, मराठवाडा, खान्देश असा सुवर्णमध्य साधणारे व रेल्वे लाईनला लागून शेगावपासून काही अंतरावरील उंद्री गावाची निवड केली होती. त्यासाठी दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रेशिडियन्ट कमिटी नियुक्ती करण्यात आली हो ती.