शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कांदा विक्रीची पावती नसल्याने शेतकरी राहणार मदतीपासून वंचित

By admin | Updated: September 2, 2016 02:23 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांकडे विक्री पावत्याच नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार.

गिरीश राऊत खामगाव (जि. बुलडाणा), दि. १: कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल १00 रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा व मलकापूर तालुका वगळता इतर ११ तालुक्यांत करण्यात आलेल्या कांदा विक्रीबाबत कोणत्याही विक्री पावत्या शेतकर्‍यांकडे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या या मदतीपासून वंचित राहणार आहेत. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १00 रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जुलै व ऑगस्टमध्ये कृउबासमध्ये कांद्याची विक्री केलेल्या शेतकर्‍यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. एका शेतकर्‍यास जास्तीत जास्त २00 क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार असून, मुंबई बाजार समिती वगळता राज्यातील इतर सर्व बाजार समित्यांसाठी हे अनुदान लागू राहणार आहे. हे अनुदान मिळण्यासाठी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सातबाराचा उतारा, बँक बचत खाते क्रमांकासोबतच कांदा विक्रीपट्टी आदी तपशिलासह संबंधित बाजार समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र शासनाने अनुदान जाहीर केले असले, तरी या निर्णयानुसार बुलडाणा जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यात केवळ नांदुरा व मलकापूर तालुक्यातच कृउबासमध्ये कांद्याची खरेदी-विक्री केली जाते. इतर ११ तालुक्यात मात्र कृउबासमध्ये कांद्याची खरेदी होत नसल्याने शेतकरी कृउबासमध्ये कांदा विक्रीसाठी आणत नाहीत. कांद्याला मिळणारा अत्यल्प असा २ ते ३ रुपये प्रतिकिलोचा भाव पाहता वाहतुकीचा खर्चसुद्धा तोट्यात टाकणारा असल्याने तसेच लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकर्‍यांनी शेतातच कांदा ठेवला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे साठवणूक केल्यानंतरसुद्धा कांद्याचे भाव न वाढल्याने तसेच कांदा निसणीवर होणारा खर्च व सडून कांद्याचे होणारे नुकसान पाहता शेतकर्‍यांनी शेतातूनच कांदा विकण्यास पसंती दिली. तर व्यापार्‍यांनीही शेतकर्‍यांची ही अडचण पाहता अडवणूक करीत मातीमोल भावाने शेतातूनच शेतकर्‍यांच्या कांद्याचे मोजमाप करुन खरेदी केली. अखेर उशिरा का होईना शासनाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल १00 रुपयेप्रमाणे २00 क्विंटल र्मयादेपर्यंत अनुदान जाहीर केले. मात्र या अनुदानाच्या निकषात विक्रीचिठ्ठी मागितल्याने हजारो कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. तेव्हा शासनाने विक्रीचिठ्ठी आवश्यक न करता अटींमध्ये शिथिलता दिली, तरच कांदा उत्पादक शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने मदत व न्याय मिळू शकेल.