शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

भारतभाऊंबाबत दुमत नाहीच, पण श्वेताताईंचाही खारीचा वाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:04 IST

चिखली : पेनटाकळी प्रकल्पाचे निर्माते नि:संशयपणे भारत बोंद्रे हेच आहेत. त्यांनी अनेक खस्ता खाऊन चिखली तालुक्यातच नव्हे तर पूर्ण ...

चिखली : पेनटाकळी प्रकल्पाचे निर्माते नि:संशयपणे भारत बोंद्रे हेच आहेत. त्यांनी अनेक खस्ता खाऊन चिखली तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात अनेक प्रकल्प राबवून जिल्हा जलमय केला आहे. सुप्रमा मान्यतेसाठीही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. यामध्ये आमदार श्वेता महाले यांनीदेखील प्रयत्न केलेले असल्याने ही मान्यता मिळण्यासाठी त्यांचाही खारीचा वाटा निश्चितपणे आहे, असे मत पेनटाकळी प्रकल्पग्रस्त शेतकरी जीवन जाधव यांनी एका प्रसिद्धिपत्रकाव्दारे व्यक्त केले आहे.

आमदारांनी सुप्रमा मान्यतेचे श्रेय घेऊ नये, असा सल्ला राकाँचे शंतनू बोंद्रे यांनी दिला होता. या पृष्ठभूमीवर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एक प्रसिध्दिपत्रक काढून प्रकल्पग्रस्तांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यामध्ये पेनटाकळी प्रकल्पाच्या पश्चजलाने बाधित होणाऱ्या घानमोड, मानमोड, पांढरदेव आणि देवदरी या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी माजी मंत्री भारत बोंद्रे पहिल्यापासूनच प्रयत्नशील आहेत. परंतु, आमदार श्वेता महाले यांनीदेखील या गावांच्या पुनर्वसनासह अन्य कामे पूर्ण होण्यासाठी मिळालेली चतुर्थ सुप्रमासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आमदार झाल्याबरोबर त्यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केल्याने रखडलेली सुप्रमा देण्याची कार्यवाही शासनाने केली. यात श्रेय घेण्याचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. आ. महाले यांनी पेनटाकळी प्रकल्पास मिळालेल्या सुप्रमा प्रस्तावाला मान्यता मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची वस्तुस्थिती मांडली असल्याचे घानमोड येथील प्रकल्प बाधित जीवन जाधव आणि राजेश पाटील या शेतकऱ्यांनी या प्रसिद्धी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून आ. महाले यांनी लक्ष घातले आहे. एव्हढेच नव्हे तर या सुप्रमासाठी पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांचेही योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे हा श्रेयाचा विषय नसून केलेल्या कामाचा आहे. यामध्ये भारतभाऊंचा सिंहाचा वाटा निश्चित आहे आणि त्यात आमदार श्वेता महाले यांचा खारीचा का होईना पण वाटा आहे, हे मान्य करावेच लागेल, अशा भावना या शेतकऱ्यांनी प्रसिध्दिपत्रकाव्दारे दिल्या आहेत.