शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मुलीच्या लग्नापूर्वीच शेतकरी वडिलांनी केली आत्महत्या

By सदानंद सिरसाट | Updated: March 16, 2024 15:07 IST

१५ फेब्रुवारी रोजी आलेल्या चक्रीवादळ व गारपिटीमुळे बंडू पाटील यांच्या शेतातील संपूर्ण २ एकर मका भुईसपाट झाला. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे १ लाख रुपयांचे कर्ज होते.

वसाडी (बुलढाणा) : मुलीचे लग्न येत्या २२ मे रोजी ठरले असताना शेतातील मका पीक भुईसपाट झाले. तर त्याचवेळी बँकेच्या १ लाखाच्या कर्जासाठी सुरू असलेल्या चकरा, याप्रकाराला कंटाळून नांदुरा तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी रवींद्र मुरलीधर कोळस्कार ऊर्फ बंडू पाटील यांनी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली.

१५ फेब्रुवारी रोजी आलेल्या चक्रीवादळ व गारपिटीमुळे बंडू पाटील यांच्या शेतातील संपूर्ण २ एकर मका भुईसपाट झाला. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व सततच्या नापिकीमुळे कर्ज भरू न शकल्याने बँकेचे अधिकारी वसुलीसाठी त्रास देत असत. मुलीचे लग्न २२ मे २०२४ रोजी ठरले.

शेतात डौलात उभा असलेला मका गारपीट व चक्रीवादळामुळे एका रात्रीत भुईसपाट झाला. उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या शेती व शेतपिकाचे झालेले नुकसान या सर्व बाबींचा मनस्ताप झाला. ९ मार्च रोजी सायंकाळी शेतात विषारी कीटकनाशक औषध प्राशन केले. त्यांना नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जैस्वाल यांनी तातडीने खामगाव येथे पाठविले. तब्येत बिघडल्यामुळे अकोला येथे हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर १५ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे.