शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

तंटामुक्त गाव अभियानाकडे नऊ जिल्ह्यांनी फिरविली पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:10 IST

राज्यातून प्रथम आलेल्या बुलडाण्याचाही समावेश

फहीम देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : "महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान" कार्यक्रमात २०१५-१६ वर्षांत राज्यातील नऊ जिल्हे सहभागीच झाले नाहीत. तंटामुक्तीत राज्यात पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यानेसुद्धा या लोकोपयोगी अभियानातून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी राज्य सरकारने २००७ मध्ये सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना आता दुर्लक्षित होऊ लागली आहे. गेल्या वर्षी राज्यातील नऊ जिल्ह्यांनी यामध्ये सहभागच घेतला नाही. बुलडाणा जिल्ह्यासह जालना, बीड, नांदेड, गडचिरोली, सांगली, नंदूरबार, रायगड आणि ठाणे या नऊ जिल्ह्यांनी तंटामुक्ती कार्यक्रमात भागच घेतला नाही. यामुळे शासनाने काढलेल्या यासंबंधीच्या परिपत्रकात बुलडाणा जिल्ह्याने स्वयंमूल्यमापनामध्ये सहभाग घेतला नाही, असे उल्लेखित केले आहे. २०१५-१६ मध्ये राज्यातील १५४ गावे तंटामुक्त झाली असून, त्यामध्ये सर्वाधिक ३४ गावे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. या गावांना लवकरच पुरस्कार मिळणार आहेत. गावांनी स्वयंमूल्यमापनानुसार, गाव तंटामुक्त झाल्याचे घोषित केले. सदर गावांचे ५ मे, २०१६ ते ५जून २०१६ या कालावधीत मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये १५४ गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली, २० जून २०१६ ते २० जुलै २०१६ या कालावधीत या गावाचे जिल्हा बाह्य मूल्यमापन करण्यात आले असून समित्यांनी आपला अहवाल सादर केला आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गावाकडून पोलीस प्रशासनाने अहवाल बोलावला नाही. शिवाय शासनाला कळविलेही नाही.राज्यात २०१५-१६ मध्ये या अभियानास प्रतिसाद कमी मिळाला आणि परिणाम म्हणून तंटामुक्त गावांची संख्याही १५४ एवढीच राहिली. बुलडाणा जिल्ह्यात सुरुवातीची काही वर्षे ही मोहीम वेगाने सुरू होती. गावागावात तंटामुक्तीचे वातावरण आणि पुरस्कार मिळविण्यासाठीची स्पर्धा सुरू होती. ग्रामस्थ आणि पोलीस अधिकारीही यामध्ये उत्साहाने सहभागी होत होते. त्यानंतर मात्र यातील उत्साह कमी होत गेला. अनेक गावांत केवळ कागदोपत्रीच कामकाज केले जाऊ लागले. अलीकडे मात्र सर्वच पातळ्यांवर ही योजना मागे पडली आहे. या अभियानाला आता स्पर्धेच्या दृष्टीने नव्हे तर आवश्यकता समजून अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे.नागरिकांनी केले होते आंदोलनमहात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाकडे शासकीय पातळीवरून अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, पोलीस यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून या अभियानाच्या माध्यमातून गावा-गावांत शांतता प्रस्थापित होण्यास मोठी मदत होऊ शकते. या अभियानास मिळणारा प्रतिसाद कमी होणे योग्य नाही. जिल्ह्यात या अभियानास लोकचळवळीचे स्वरुप यावे, यासाठी सत्तेत असलेल्या आणि नसलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षाचे पुढारी प्रयत्न करू शकतात. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि प्रशासनही यासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.जिल्ह्यातील फक्त आठ गावे तंटामुक्त होणे बाकीतत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी २०१२-१३ या कार्यकाळात बुलडाणा जिल्ह्यात तंटामुक्तीवर भरीव कामगिरी केल्याने जिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायतींंपैकी ८५९ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत; मात्र त्यांच्या बदलीनंतर या अभियानावर मेहनत न झाल्याने तीन वर्षांचा कालावधी उलटला, तरी राहिलेली आठ गावे तंटामुक्त झालेली नाहीत. सध्याचे पोलीस अधीक्षक मीणा यांनी या लोकोपयोगी अभियानाला पुढे नेत त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण बुलडाणा जिल्हा तंटामुक्त करावा, अशी मागणी होत आहे.