शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शिक्षकांनी गुणवत्तेसाठी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: August 11, 2015 23:29 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत कार्यशाळेत सीईओ दीपा मुधोळ यांचे आवाहन.

बुलडाणा : जिल्हाभरात शाळा भेटीच्या माध्यमातून शाळांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी भाषा आणि गणिताच्या संदर्भात चांगली प्रगती असल्याचे दिसून आले. इयत्ता पहिली व दुसरीची गुणवत्ता खूप चांगली आहे; मात्र इयत्ता ५ वी ते ८ वी चे विद्यार्थ्यांना अजून कौशल्य प्राप्तीसाठी शिक्षकांनी मेहनत घेणे आवश्यक आहे. राज्यस्तरावरून गुणवत्तेच्या संदर्भात शिक्षकांवर जी जबाबदारी सोपविली ती शिक्षकांनी अंगिकारली तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून शाळेच्या गुणवत्तेत फरक दिसेल म्हणून येणार्‍या काळात शिक्षकांनी पूर्ण क्षमतेने काम करावे आणि गुणवत्तेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणाच्यावतीने ११ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुधोळ म्हणाल्या की, जिल्ह्याची गुणवत्ता प्रतिवर्षी १0 टक्के वाढवून शाळेचा, केंद्राचा आणि जिल्ह्याचा शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील शिक्षक ते शिक्षणाधिकारी या सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मातृभाषेसोबतच इंग्रजी व हिंदी भाषा विद्यार्थ्यांना अवगत होईल, तिचा व्यवहारात वापर करता येईल, अशा दृष्टीने शिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी मंचावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.सुभाष कांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग आदी उपस्थित होते.