शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

शिक्षक पुरस्कारांविनाच साजरा होणार जिल्हा परिषदेचा शिक्षकदिन

By admin | Updated: September 5, 2015 00:01 IST

पुरस्कारांसाठी प्रस्ताव संख्येने कमी आल्यामुळे याहीवर्षी शिक्षकदिनी हा पुरस्कार सोहळा होणार नाही.

बुलडाणा : शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, कार्यक्रमांचेही आयोजन होते; मात्र सर्व शिक्षकांना प्रतीक्षा असते ती शिक्षक गौरव पुरस्काराची. ह्यजिल्हा आदर्श शिक्षकह्ण असे काही वर्षांंपूर्वी नामाभिधान असलेले हे पुरस्कार आता ह्यजिल्हा शिक्षक गौरवह्ण या नावाने दिले जात असले तरी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव संख्येने कमी आल्यामुळे याहीवर्षी शिक्षकदिनी हा पुरस्कार सोहळा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून किमान एक अशा १३ शिक्षकांना जिल्हा शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून १ ऑगस्टपर्यंंत उपक्रमशील शिक्षकांचे प्रस्ताव आमंत्रित केले जातात. या प्रस्तावांवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती यांच्या नेतृत्वातील समिती निर्णय घेते. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर पुरस्कारांचे वितरण केले जाते. सन २0१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा शिक्षक गौरव पुरस्काराकरिता केवळ पाच प्रस्ताव आले. प्रस्तावांची ही संख्या लक्षात घेता, निवड समिती तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी जिल्हाभरात नवोपक्रम स्पर्धेत सहभाग घेणार्‍या शिक्षकांनाही अशा पुरस्काराबाबत माहिती द्यावी व प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आता शिक्षक गौरव पुरस्कारासाठी पुन्हा प्रस्ताव आमंत्रित केले असून, ३0 नोव्हेंबरपर्यंंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षकदिनी हा सोहळा व्हावा, अशी इच्छा शिक्षकांची असली तरी त्यांच्याकडूनच प्रस्ताव नसल्यामुळे हा सोहळा आता नोव्हेंबर महिन्यात येणार्‍या राष्ट्रीय शिक्षकदिनी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रस्तावांची प्रक्रिया संपणार तरी कधी? उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांना आपण केलेल्या कार्याचे सादरीकरण स्वत: करावे लागते. या सादरीकरणाच्या प्रस्तावावरच जिल्हा परिषद जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कारासाठी निवड करते. आपण केलेल्या कामाचे आपणच कौतुक करण्यासारखा हा प्रकार अनेक चांगल्या शिक्षकांना आवडत नाही. त्यामुळे असे अनेक शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहतात. त्यामुळेच चांगल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्तावच सादर केले नाहीत. जिल्हा परिषदेमार्फत प्रस्ताव मागविण्याची ही प्रक्रिया संपविण्याची गरज आता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेमार्फत एक समिती गठित करुन, त्या समितीने चांगल्या शिक्षकांचा शोध घेऊन पुरस्कार दिला, तर ते अधिक प्रभावी ठरू शकते, अशी मागणी अनेक शिक्षकांची आहे.