शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

संचमान्यता रखडल्याने शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 11:52 IST

Khamgaon News : शाळा बंद असल्यामुळे जिल्ह्यात दोन वर्षांपासून संचमान्यताही झाली नाही.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून, गत दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे जिल्ह्यात दोन वर्षांपासून संचमान्यताही झाली नाही. त्यामुळे शिक्षकांची पदोन्नतीही रखडली आहे.दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी असलेल्या शाळेच्या पटसंख्येनुसार संचमान्यता होते. शाळेत पटावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळेत  किती शिक्षकांची गरज आहे, हे ठरविण्यात येते. यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी कमी आहेत, तेथील शिक्षक अतिरिक्त ठरतात; तर ज्या शाळेत पटावरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, त्या शाळेत शिक्षकांची बदली करण्यात येते. तसेच काही शिक्षक सेवानिवृत्त होतात किंवा अन्य कारणांमुळे जागा रिक्त होतात. गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण शाळा बंद होत्या. त्यामुळे संचमान्यता झाली नाही.  त्यामुळे शिक्षक समायोजनाचा प्रश्न कायम असून, अनेकांना पदोन्नतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच संचमान्यता झाली नसल्यामुळे शाळांमधील शिक्षक संख्या तसेच अतिरिक्त शिक्षकांचे गणित सध्या बिघडले आहे. एकीकडे अतिरिक्त शिक्षक, तर दुसरीकडे रिक्त पदे असे काहीसे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या वर्षी अद्याप पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत.  पुढील महिन्यातही शाळा सुरू होण्याबाबत निश्चिती नाही. त्यामुळे या वर्षीही संचमान्यता होईल की नाही, याबाबत संभ्रम आहे. परिणामी शिक्षकांमधील चिंता वाढली आहे.

गत दोन वर्षांपासून संचमान्यता झाली नाही. ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार संचमान्यता करून शिक्षक निर्धारण करण्यात येते. मात्र गतवर्षी कोरोना आजारामुळे शाळा भरलीच नाही. त्यामुळे संचमान्यता झाली नाही. - गजानन गायकवाडगटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगाव

गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात संच मान्यता झाली नाही. त्यामुळे पदोन्नती व शिक्षक निर्धारण प्रक्रिया रखडली आहे. शासनाने लवकरात लवकर संचमान्यता करायला हवी. यामुळे शिक्षक निर्धारण होईल व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.- विठ्ठल पाटेखेडे,शिक्षक सेना, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावTeacherशिक्षक