शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

काेराेनाविषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक दिमतीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:33 IST

ओमप्रकाश देवकर, लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करून त्याच्या अंमलबजावणीचे काम ...

ओमप्रकाश देवकर,

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करून त्याच्या अंमलबजावणीचे काम सुरू केले आहे. याकरिता जिल्हा परिषद शिक्षकांच्या या कामी नेमणुका केल्या आहेत. मात्र, पोलिसांच्या मदतीला तसेच लसीकरण व ग्रामस्तरीय समितीमध्ये नेमणूक झालेल्या शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने शिक्षकांची दमछाक होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.

जिल्ह्यासह मेहकर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. याकरिता गावस्तरीय समिती तयार करून या समितीमध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, पोलीसपाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदींची नेमणूक केली आहे. यामध्ये इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार यांच्या आदेशाने मेहकर पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्यांच्या मदतीला शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. हे शिक्षक मेहकर पोलिसांना सहकार्य करत आहेत. याशिवाय ग्रामस्तरीय समितीमध्ये शिक्षकांच्या नेमणुका केल्या असून, त्यांच्याकडे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयसोलेशन कक्ष तयार करणे, घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणे, त्याची नोंद करणे, कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना पुढील तपासणीसाठी आरोग्य केंद्राकडे पाठवणे यासारखी कामे त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. त्याप्रमाणे ते काम करत आहेत. मात्र, असे असतानाही या शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, शिक्षकांना पेट्रोल घेण्यास अडचणीचे जात आहेत. पेट्रोल पंप चालकांकडून त्यांना नियुक्तीचा आदेश दाखवा, अशी मागणी होत आहे. यामुळे इन्सिडेंट कमांडर यांच्याकडून या शिक्षकांना अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

अनेकांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने ग्राम पातळीवर काम करत असलेल्या शिक्षकांना अशाप्रकारे तोंड द्यावे लागत असेल तर या बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव

ग्रामस्तरीय समितीमध्ये नेमणूक असलेला एक शिक्षक आपले काम आटोपून घरी परतत असताना पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्यावर कार्यवाही केली. संबंधित शिक्षकाने अनेकवेळा सांगितले की, मी प्रशासनाच्या आदेशानुसार कामावर गेलो होतो. तरीही त्या शिक्षकावर कारवाई करण्यात आली. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावरुन प्रशासनामध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.