शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

काेराेनाविषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक दिमतीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:33 IST

ओमप्रकाश देवकर, लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करून त्याच्या अंमलबजावणीचे काम ...

ओमप्रकाश देवकर,

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करून त्याच्या अंमलबजावणीचे काम सुरू केले आहे. याकरिता जिल्हा परिषद शिक्षकांच्या या कामी नेमणुका केल्या आहेत. मात्र, पोलिसांच्या मदतीला तसेच लसीकरण व ग्रामस्तरीय समितीमध्ये नेमणूक झालेल्या शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने शिक्षकांची दमछाक होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.

जिल्ह्यासह मेहकर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. याकरिता गावस्तरीय समिती तयार करून या समितीमध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, पोलीसपाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदींची नेमणूक केली आहे. यामध्ये इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार यांच्या आदेशाने मेहकर पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्यांच्या मदतीला शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. हे शिक्षक मेहकर पोलिसांना सहकार्य करत आहेत. याशिवाय ग्रामस्तरीय समितीमध्ये शिक्षकांच्या नेमणुका केल्या असून, त्यांच्याकडे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयसोलेशन कक्ष तयार करणे, घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणे, त्याची नोंद करणे, कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना पुढील तपासणीसाठी आरोग्य केंद्राकडे पाठवणे यासारखी कामे त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. त्याप्रमाणे ते काम करत आहेत. मात्र, असे असतानाही या शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, शिक्षकांना पेट्रोल घेण्यास अडचणीचे जात आहेत. पेट्रोल पंप चालकांकडून त्यांना नियुक्तीचा आदेश दाखवा, अशी मागणी होत आहे. यामुळे इन्सिडेंट कमांडर यांच्याकडून या शिक्षकांना अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

अनेकांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने ग्राम पातळीवर काम करत असलेल्या शिक्षकांना अशाप्रकारे तोंड द्यावे लागत असेल तर या बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव

ग्रामस्तरीय समितीमध्ये नेमणूक असलेला एक शिक्षक आपले काम आटोपून घरी परतत असताना पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्यावर कार्यवाही केली. संबंधित शिक्षकाने अनेकवेळा सांगितले की, मी प्रशासनाच्या आदेशानुसार कामावर गेलो होतो. तरीही त्या शिक्षकावर कारवाई करण्यात आली. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावरुन प्रशासनामध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.