शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चे झोपा काढो आंदोलन

By admin | Updated: August 2, 2016 01:34 IST

शासनाकडून शेतक-यांची थट्टा; तहसीलदारास निवेदन.

खामगाव (जि. बुलडाणा) : सन २0१५ या मागील वर्षात तालुक्यातील दुष्काळग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना एकरी फक्त २८ रु. ८0 पै. पीक विमा मंजूर करुन शेतकर्‍यांची थट्टा केली आहे. याबाबत निवेदन दिल्यानंतरही अद्याप दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी नांदुरा तहसीलदार वैशाली देवकर यांच्या दालनातच शेकडो शेतकर्‍यांसह ह्यझोपा काढोह्ण हे अभिनव आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांचे नेतृत्वात करण्यात आले. याबाबत तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २0१५ च्या हंगामात तालुक्यात ९0 टक्के सोयाबीनची पेरणी झाली असताना उशिरा आलेल्या व अत्यल्प झालेल्या पावसामुळे सोयाबीनला फुले व शेंगा सुध्दा लागलेल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना पेरणी मोडावी लागली होती. या नुकसानीच्या गावनिहाय, समितीसह, गटांचे पंचनाम्यावर सुध्दा उत्पन्न निरंक (शून्य) आलेले आहेत. अशा भीषण दुष्काळजन्य परिस्थितीमुळे राबराब राबून जगाला धान्य पुरविणार्‍या शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आलेली असताना तालुक्यातील दुष्काळग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना एकरी २८ रु. ८0 पै. पीक विमा मंजूर करण्यात आला. याबाबत १२ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देवून शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली होती. मात्र या निवेदनाची अधिकार्‍यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या, प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेमुळे शासनाची दिशाभूल करीत, शासनाला बदनाम करुन शेतकर्‍यांची क्रूर थट्टा करण्यात आली असून प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांचे नेतृत्वात सदरचे आंदोलन करण्यात आले.