शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

‘स्वाभिमानी’चे झोपा काढो आंदोलन

By admin | Updated: August 2, 2016 01:34 IST

शासनाकडून शेतक-यांची थट्टा; तहसीलदारास निवेदन.

खामगाव (जि. बुलडाणा) : सन २0१५ या मागील वर्षात तालुक्यातील दुष्काळग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना एकरी फक्त २८ रु. ८0 पै. पीक विमा मंजूर करुन शेतकर्‍यांची थट्टा केली आहे. याबाबत निवेदन दिल्यानंतरही अद्याप दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी नांदुरा तहसीलदार वैशाली देवकर यांच्या दालनातच शेकडो शेतकर्‍यांसह ह्यझोपा काढोह्ण हे अभिनव आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांचे नेतृत्वात करण्यात आले. याबाबत तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २0१५ च्या हंगामात तालुक्यात ९0 टक्के सोयाबीनची पेरणी झाली असताना उशिरा आलेल्या व अत्यल्प झालेल्या पावसामुळे सोयाबीनला फुले व शेंगा सुध्दा लागलेल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना पेरणी मोडावी लागली होती. या नुकसानीच्या गावनिहाय, समितीसह, गटांचे पंचनाम्यावर सुध्दा उत्पन्न निरंक (शून्य) आलेले आहेत. अशा भीषण दुष्काळजन्य परिस्थितीमुळे राबराब राबून जगाला धान्य पुरविणार्‍या शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आलेली असताना तालुक्यातील दुष्काळग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना एकरी २८ रु. ८0 पै. पीक विमा मंजूर करण्यात आला. याबाबत १२ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देवून शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली होती. मात्र या निवेदनाची अधिकार्‍यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या, प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेमुळे शासनाची दिशाभूल करीत, शासनाला बदनाम करुन शेतकर्‍यांची क्रूर थट्टा करण्यात आली असून प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांचे नेतृत्वात सदरचे आंदोलन करण्यात आले.