शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

आपत्ती काळातही ९७ मनोरुग्णांचा धैर्याने सांभाळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:32 IST

सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाची झळ सर्वच क्षेत्रांना बसली. अशीच झळ तालुक्यातील ...

सुधीर चेके पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाची झळ सर्वच क्षेत्रांना बसली. अशीच झळ तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील निराधार, बेवारस आणि मनोरुग्णांचा हक्काचा निवारा असलेल्या ‘सेवासंकल्प प्रतिष्ठान’लाही बसली हाेती. कोरोनामुळे धडधाकट माणसांच्या पोटापाण्याचा प्रश्न उद्भवलेला असताना केवळ दानशुरांच्या मदतीवर अवलंबून असलेल्या ‘सेवासंकल्प’तील ९७ मनोरुग्णांचा उदरनिर्वाह भागविण्याच्या दिव्यातून प्रतिष्ठानला जावे लागले असले तरी काही प्रमाणात ही आपत्ती प्रतिष्ठानसाठी इष्टापत्तीदेखील ठरली आहे.

समाजातील अनेक निराधार, बेवारस आणि मनोरुग्ण किंवा शरिराने जर्जर होऊन रस्त्यावर बेवारस असलेल्या गोरगरीब व्यक्तिंसाठी सेवासंकल्प प्रतिष्ठान हे हक्काचे घर उभे करून त्यांचा सांभाळ करण्याचे काम डॉ. नंदकिशोर व डॉ. आरती पालवे यांच्याकडून सुरु आहे. हा प्रकल्प पूर्णत: समाजातील दानशुरांच्या मदतीवर अवलंबून आहे. याठिकाणी सध्या ९७ मनोरुग्णांचा सांभाळ केला जात आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात सर्वांचेच अर्थचक्र बिघडल्याने प्रतिष्ठानला होणारी मदत काही प्रमाणात कमी झाल्याने प्रकल्पावरील रुग्णांचा उदरनिर्वाह मध्यंतरी बिकट बनला होता. या बिकट काळातही काही दानशुरांनी सढळ हाताने मदत केल्याने अन्नधान्य व किराण्याचा प्रश्न सुटू शकला.

प्रकल्पावरील मनोरुग्णांच्या पोटापाण्यासह त्यांच्या आरोग्याची योग्यतऱ्हेने देखभाल होत असताना प्रकल्पाला कोराेनाची बाधा होऊ न देणे ही मोठी जबाबदारी या काळात पालवे दाम्पत्याने लिलया पार पाडली. प्रकल्पावरील मनोरुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रकल्पाला भेट देण्यास इच्छुक विविध समाजसेवी संस्था व व्यक्तिंना नम्रपणे नकार देण्यात आला. तथापि, नवीन रुणांना प्रकल्पावर दाखल करून घेणेही थांबविण्यात आले होते. मात्र, अशा कठीण काळातही चार नवीन मनोरुग्ण महिलांची इतरत्र कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आले. मात्र, त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यासह खबरदारीचे सर्व उपाय काटेकोरपणे पाळण्यात येऊन प्रकल्पातील सर्वांचा सांभाळ या कठीण काळातही पालवे दाम्पत्याने मोठ्या धैर्याने व नेटाने पार पाडला. या प्रकल्पात आज ९७ मनोरुग्णांचा सांभाळ केला जात आहे.