शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी घेतली बळीराजाच्या संरक्षणाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:22 IST

डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळे तील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी २२ ऑगस्ट रोजी मातीच्या बैलांचा  पोळा भरवून बळीराजाच्या संरक्षणाची व बैल कत्तलखान्यात जाऊ  न देण्याची सामूहिक शपथ घेतली. चिमुकल्यांच्या तोंडून शे तकर्‍यांच्या संरक्षणाच्या पडणार्‍या या शब्दांनी सर्वांचेच लक्ष  वेधले. 

ठळक मुद्देविठ्ठल रुखमाई प्राथमिक शाळेचा उपक्रम विद्यार्थ्यांनी भरविला मातीच्या बैलांचा पोळा

डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळे तील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी २२ ऑगस्ट रोजी मातीच्या बैलांचा  पोळा भरवून बळीराजाच्या संरक्षणाची व बैल कत्तलखान्यात जाऊ  न देण्याची सामूहिक शपथ घेतली. चिमुकल्यांच्या तोंडून शे तकर्‍यांच्या संरक्षणाच्या पडणार्‍या या शब्दांनी सर्वांचेच लक्ष  वेधले. स्थानिक श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये सर्व प्रथम चिमुकल्यांनी सोबत आणलेले मातीचे बैल शाळेत एकत्र  ठेवून पोळा भरविण्यात आला. व त्यानंतर त्यांची आरती करून  पूजा करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक आत्माराम दांदडे, हेमंत जोशी व संजीव भार ते यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना शेतकरी व बैल यांच्या  संबंधाविषयी माहिती देऊन त्यांचे संगोपन करावे, असे सांगितले.त्यानंतर शिक्षक संजीव भारते यांनी व विद्यार्थी व शिक्षक यांनी  आम्ही बैलाची पूजा करतो, तो आमचा मित्र आहे. शेती कामात  मशागतीच्या वेळी तो आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतो,  म्हणून आम्ही त्याच्या संरक्षणाची शपथ घेतो व म्हातारपणीही  आम्ही त्याचे संगोपन करू व आम्ही त्याला कत्तलखान्यात जाऊ  देणार नाही, अशी शपथ चिमुकल्यांनी घेतली. यावेळी शालेय  शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 

पोशिंदा जगण्याकरिता शेतकर्‍यांची शपथ पोळा सणाच्या दिवसाचे औचित्य साधून जगाचा पोशिंदा  जगण्याकरिता तसेच त्याला नैतिक पाळबळ देण्याकरिता मेहकर  तालुक्यातील बार्‍हई गावातील शेतकर्‍यांनी सामूहिक शपथ घे तली. शेतकरी हा सर्व जनतेचा पोशिंदा आहे. शेतकरी पिकवतो,  त्यामुळे सर्वांच्या पोटाची खळगी भरते; परंतु आज तोच पोशिंदा  निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त आहे. कर्जाच्या बोझ्याखाली दपत  असून, आत्महत्येला जवळ करीत आहे. शेतकर्‍यांच्या वाढत्या  आत्महत्येच्या पार्श्‍वभूमीवर या पोशिंद्याला नैतिक पाठबळ  देण्यासाठी ‘आम्ही तुझ्या सोबत आहोत’ ही शपथ मेहकर तालु क्यातील बार्‍हई येथील गावकर्‍यांच्यावतीने घेण्यात आली.   बार्‍हई येथील धर्मवीर प्रतिष्ठानच्या नवयुवकांनी शेतकर्‍यांना नै ितक पाठबळ देण्यासाठी शपथ घेतली. यावेळी धर्मवीर प्रतिष्ठानचे  अध्यक्ष वैभव सुभाष पागोरे, सचिन अनंतराव पागोरे, कैलास  दत्तात्रय पागोरे, गजानन अंबादास पागोरे, निखिल विजय पागोरे,  अरविंद भारत पागोरे, धनंजय व्यंकट पागोरे, नंदकिशोर पागोरे,  मदन पागोर, प्रताप मदन पागोरे, विनोद महादू पागोरे, सतीश रमेश  पागोरे, ऋषिकेश राजेंद्र पागोरे, पवन प्रदीप पागोरे व गावकरी उ पस्थित होते.