शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

स्वराज्याप्रमाणेच सर्वांना न्याय देणारे शासन हवे : महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

चिखली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला होता. म्हणूनच तळागाळातील गोरगरीब जनतेला छत्रपती शासन स्वराज्य वाटत होते. मात्र, ...

चिखली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला होता. म्हणूनच तळागाळातील गोरगरीब जनतेला छत्रपती शासन स्वराज्य वाटत होते. मात्र, सध्याची स्थिती पाहता राज्य सरकारला मराठा आरक्षणासह ओबीसींचे राजकीय आरक्षणसुद्धा टिकविता आले नाही. राज्यातील जनता कोरोनामुळे हैराण असल्याने त्यातही सरकारची कामगिरी निराशाजनक आहे. परिणामी समाजातील कोणताही घटक आज खुश नाही आहे. राज्यातील प्रत्येकाला हे राज्य स्वत:चे राज्य वाटेल, सर्वांना न्याय मिळेल, अशा शासनाची आज खरी गरज असल्याने, सरकारने आपल्या कारभारात सुधारणा करावी, असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी केले.

चिखली पंचायत समितीच्या प्रांगणात आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. छत्रपती शिवरायांच्या जयघोषात ही स्वराज्यगुढी आ. महाले यांच्या हस्ते उभी करून राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी पं. स. सभापती सिंधू तायडे, पंडितराव देशमुख, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, संतोष काळे पाटील, अंकुशराव तायडे, गटविकास अधिकारी हिवाळे, गटशिक्षण अधिकारी शिंदे, बालविकास अधिकारी गवळी, पाटोळे, सुरेश इंगळे, भागवत पाटील व कर्मचारी वृंद उपस्थित होते. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज आ. महाले यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, न. प. सभापती विजय नकवाल, सुभाषअप्पा झगडे आदी उपस्थित होते.