शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्याप्रमाणेच सर्वांना न्याय देणारे शासन हवे : महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

चिखली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला होता. म्हणूनच तळागाळातील गोरगरीब जनतेला छत्रपती शासन स्वराज्य वाटत होते. मात्र, ...

चिखली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला होता. म्हणूनच तळागाळातील गोरगरीब जनतेला छत्रपती शासन स्वराज्य वाटत होते. मात्र, सध्याची स्थिती पाहता राज्य सरकारला मराठा आरक्षणासह ओबीसींचे राजकीय आरक्षणसुद्धा टिकविता आले नाही. राज्यातील जनता कोरोनामुळे हैराण असल्याने त्यातही सरकारची कामगिरी निराशाजनक आहे. परिणामी समाजातील कोणताही घटक आज खुश नाही आहे. राज्यातील प्रत्येकाला हे राज्य स्वत:चे राज्य वाटेल, सर्वांना न्याय मिळेल, अशा शासनाची आज खरी गरज असल्याने, सरकारने आपल्या कारभारात सुधारणा करावी, असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी केले.

चिखली पंचायत समितीच्या प्रांगणात आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. छत्रपती शिवरायांच्या जयघोषात ही स्वराज्यगुढी आ. महाले यांच्या हस्ते उभी करून राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी पं. स. सभापती सिंधू तायडे, पंडितराव देशमुख, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, संतोष काळे पाटील, अंकुशराव तायडे, गटविकास अधिकारी हिवाळे, गटशिक्षण अधिकारी शिंदे, बालविकास अधिकारी गवळी, पाटोळे, सुरेश इंगळे, भागवत पाटील व कर्मचारी वृंद उपस्थित होते. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज आ. महाले यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, न. प. सभापती विजय नकवाल, सुभाषअप्पा झगडे आदी उपस्थित होते.