शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्वराज्याप्रमाणेच सर्वांना न्याय देणारे शासन हवे : महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

चिखली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला होता. म्हणूनच तळागाळातील गोरगरीब जनतेला छत्रपती शासन स्वराज्य वाटत होते. मात्र, ...

चिखली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला होता. म्हणूनच तळागाळातील गोरगरीब जनतेला छत्रपती शासन स्वराज्य वाटत होते. मात्र, सध्याची स्थिती पाहता राज्य सरकारला मराठा आरक्षणासह ओबीसींचे राजकीय आरक्षणसुद्धा टिकविता आले नाही. राज्यातील जनता कोरोनामुळे हैराण असल्याने त्यातही सरकारची कामगिरी निराशाजनक आहे. परिणामी समाजातील कोणताही घटक आज खुश नाही आहे. राज्यातील प्रत्येकाला हे राज्य स्वत:चे राज्य वाटेल, सर्वांना न्याय मिळेल, अशा शासनाची आज खरी गरज असल्याने, सरकारने आपल्या कारभारात सुधारणा करावी, असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी केले.

चिखली पंचायत समितीच्या प्रांगणात आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. छत्रपती शिवरायांच्या जयघोषात ही स्वराज्यगुढी आ. महाले यांच्या हस्ते उभी करून राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी पं. स. सभापती सिंधू तायडे, पंडितराव देशमुख, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, संतोष काळे पाटील, अंकुशराव तायडे, गटविकास अधिकारी हिवाळे, गटशिक्षण अधिकारी शिंदे, बालविकास अधिकारी गवळी, पाटोळे, सुरेश इंगळे, भागवत पाटील व कर्मचारी वृंद उपस्थित होते. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज आ. महाले यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, न. प. सभापती विजय नकवाल, सुभाषअप्पा झगडे आदी उपस्थित होते.