शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

स्वच्छ भारत मिशनलाही बसला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 12:24 IST

Swachh Bharat Mission was also hit by Corona : जिल्ह्यातील ५० गावांपैकी केवळ १४ गावांमध्येच प्रत्यक्षात कामाला प्राधान्य देता आलले आहे. 

- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या १६ महिन्यापासून कोरोना संक्रमणामुळे विविध क्षेत्राला फटका बसलेला असतानाच स्वच्छ भारत मिशनही (ग्रामीण) प्रभावीत झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील ५० गावांपैकी केवळ १४ गावांमध्येच प्रत्यक्षात कामाला प्राधान्य देता आलले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्याने शौचालय निर्मितीला प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपणी व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येत आहे. गावातील लोकसंख्येच्या आधारावर संबंधित गावात अनुषंगीक व्यवस्थापनासाठी निधी दिल्या जातो. यामध्ये १५ व्या वित्त आयोगातून ३० टक्के आणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ७० टक्के निधी दिल्या जातो. त्यातून ही कामे मार्गी लावण्यात येत आहेत. दरम्यान २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५० गावांची घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी निवड झाली होती. सोबतच या गावांमधील कामाला प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली होती. दरम्यान कोरोनाचे संक्रमण वाढल्यामुळे या ५० पैकी फक्त १४ गावाताच कामांना प्रारंभ झाला होता. ३६ गावातील कामे प्रलंबीत होती. विशेष म्हणजे या कामांसाठी पंचायत समितीनिहाय एकूण १ कोटी ४५ लाख ६७ हजार ८६५ रुपयांचा निधीही अदा करण्यात आला होता. प्रामुख्याने स्वच्छ भारत मिशनच्या या दुसऱ्या टप्प्यात प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे.दरम्यान काेराेनाचे संक्रमण आता कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील कामे आणि नव्याने करण्यात येणाऱ्या कामांचा वेग वाढण्यास मदत हाेईल, असा अंदाज व्यक्त हाेत आहे. 

महिन्याकाठी ३५१ टन घनकचराया गावांमध्ये महिन्याकाठी साधारणत: ३५१ टन घनकचरा निर्माण होतो. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून गाव परिसरात होणारे प्रदुषणही कमी करण्यावर भर दिला जात आहे. साधारणत: ४४ दिवसामंध्ये अेाल्या कचऱ्यापासून खत निर्माण होणारा, अेाला व सुक्या कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिताला प्रसंगी यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामपातळीवरील धोकादायक कचरा, निष्क्रिय कऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने यात तंत्र विकसीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पण कोरोनामुळे या उपक्रमाची व्याप्ती मधल्या काळात वाढविता आली नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानbuldhanaबुलडाणा