शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

स्वच्छ भारत मिशनलाही बसला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 12:24 IST

Swachh Bharat Mission was also hit by Corona : जिल्ह्यातील ५० गावांपैकी केवळ १४ गावांमध्येच प्रत्यक्षात कामाला प्राधान्य देता आलले आहे. 

- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या १६ महिन्यापासून कोरोना संक्रमणामुळे विविध क्षेत्राला फटका बसलेला असतानाच स्वच्छ भारत मिशनही (ग्रामीण) प्रभावीत झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील ५० गावांपैकी केवळ १४ गावांमध्येच प्रत्यक्षात कामाला प्राधान्य देता आलले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्याने शौचालय निर्मितीला प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपणी व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येत आहे. गावातील लोकसंख्येच्या आधारावर संबंधित गावात अनुषंगीक व्यवस्थापनासाठी निधी दिल्या जातो. यामध्ये १५ व्या वित्त आयोगातून ३० टक्के आणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ७० टक्के निधी दिल्या जातो. त्यातून ही कामे मार्गी लावण्यात येत आहेत. दरम्यान २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५० गावांची घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी निवड झाली होती. सोबतच या गावांमधील कामाला प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली होती. दरम्यान कोरोनाचे संक्रमण वाढल्यामुळे या ५० पैकी फक्त १४ गावाताच कामांना प्रारंभ झाला होता. ३६ गावातील कामे प्रलंबीत होती. विशेष म्हणजे या कामांसाठी पंचायत समितीनिहाय एकूण १ कोटी ४५ लाख ६७ हजार ८६५ रुपयांचा निधीही अदा करण्यात आला होता. प्रामुख्याने स्वच्छ भारत मिशनच्या या दुसऱ्या टप्प्यात प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे.दरम्यान काेराेनाचे संक्रमण आता कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील कामे आणि नव्याने करण्यात येणाऱ्या कामांचा वेग वाढण्यास मदत हाेईल, असा अंदाज व्यक्त हाेत आहे. 

महिन्याकाठी ३५१ टन घनकचराया गावांमध्ये महिन्याकाठी साधारणत: ३५१ टन घनकचरा निर्माण होतो. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून गाव परिसरात होणारे प्रदुषणही कमी करण्यावर भर दिला जात आहे. साधारणत: ४४ दिवसामंध्ये अेाल्या कचऱ्यापासून खत निर्माण होणारा, अेाला व सुक्या कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिताला प्रसंगी यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामपातळीवरील धोकादायक कचरा, निष्क्रिय कऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने यात तंत्र विकसीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पण कोरोनामुळे या उपक्रमाची व्याप्ती मधल्या काळात वाढविता आली नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानbuldhanaबुलडाणा