शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली दगडाची धूळपेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

गतवर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लागू केले हाेते़ त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा माल कवडीमोल ...

गतवर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लागू केले हाेते़ त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा माल कवडीमोल भावात विकावा लागला़ त्यानंतर कशीतरी खरिपाची पेरणी केली़ दरम्यान, सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली़ बियाण्यांच्या नुकसानभरपाईपोटी काही लोकांना मदत मिळाली; तर ज्या शेतकऱ्यांनी खासगी बियाणे विकत घेतले होते, त्यांना ती मिळाली नाही़ मूग, उडीद तोडणीवेळी संततधार पाऊस झाल्याने तोडणी पूर्ण खराब झाली; तसेच सोयाबीन हंगामात पावसामुळे सोयाबीनच्या झाडांवरच शेंगांना कोंब आले होते़ त्यामुळे त्या पिकाचीसुद्धा नासाडी झाली़ त्याचा परिणाम कपाशीवरसुद्धा झाला़ शेतीला लागलेला खर्च वसूल झाला नसल्याने गतवर्षी बँकेकडून काढलेले कर्ज भरू शकले नसल्यामुळे त्या कर्जाचे पुर्नगठण करून परत शेतकऱ्यांना वाटप करून द्यावे. विविध समस्यांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे़ आता पेरणीचे दिवस तोंडावर आले असल्याने पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी असून शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वात लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरातील भूमराळा दरी येथे चक्क दगडाची पेरणी करून शासनाच्या निषेध व्यक्त केला़ यावेळी लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल मोरे, सचिव अनिल लांडगे व शेतकरी उपस्थित होते़

पीकविम्यापासून शेतकरी वंचित

अतिवृष्टीमुळे जवळपास सर्व पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने काही भागांतील शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली तर काही भागांतील शेतकऱ्यांना अद्यापही आर्थिक मदत म्हणून काहीच मिळाले नाही़ निसर्गाच्या प्रकोपाने पिकाची नुकसान झाल्यास भरपाई मिळविण्याकरिता पंतप्रधान पीक विमा योजनाअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली़; परंतु नुकसानभरपाईचे ऑनलाइन कारण दाखवून अद्यापही शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही; तसेच कित्येक शेतकरी पंतप्रधान सन्मान योजनेपासून वंचित आहेत.