शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

बियाणेटंचाईवर उन्हाळी सोयाबीनची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST

बुलडाणा : बीजोत्पादनात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे; परंतु खरीप हंगामात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ९४ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर ...

बुलडाणा : बीजोत्पादनात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे; परंतु खरीप हंगामात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ९४ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानामुळे यंदा बियाणे तुटवड्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. बियाणेटंचाईवर ही पेरणी महत्त्वाची मात्रा ठरेल, असा अंदाज आहे.

राज्यात वाशिम, हिंगोली, परभणी आणि बुलडाणा, या चार जिल्ह्यांत प्रामुख्याने बीजोत्पादन सर्वाधिक होते. बीजोत्पादनातून जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना वर्षाकाठी तब्बल ५२ कोटी रुपयांचा मोबदला मिळत आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात १ लाख ७४ हजार क्विंटल बीजोत्पादनाचे उद्दिष्ट होते; परंतु अतिपावसामुळे या बीजोत्पादनावरही परिणाम झाला. जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ९४ हजार १३३.३७ हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात गेले. गतवर्षी निकृष्ट बियाण्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता. येत्या खरीप हंगामातील बियाणेटंचाईची शक्यता पाहता, कृषी विभागाकडून उन्हाळी पेरणीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा उन्हाळी सोयाबीन बियाणेटंचाईवर महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. उन्हाळ्यात झडती लागत नाही. त्यामुळे शक्यतो पेरणी केली जात नाही; परंतु यंदा बियाणेटंचाई पाहता, अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनला पसंती दिली आहे.

माहिती गोळा करणे सुरू

जिल्ह्यात फेब्रुवारीपासून उन्हाळी पेरणीला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा घेतला याची माहिती गोळा करण्याचे काम सध्या कृषी विभागाकडून सुरू आहे. यामध्ये मेहकर तालुक्यात सर्वाधिक उन्हाळी सोयाबीन घेण्यात आले आहे.

खरिपातील बीजोत्पादनालाही फटका

जिल्ह्यात १२ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादनाचा हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये सोयाबीन ७१ हजार ४१६ क्विंटल, उडीद ८३२ क्विंटल, मूग ४२ क्विंटलचा समावेश होता. तूर १ हजार २८४ क्विंटलचा समावेश होता; परंतु अतिवृष्टीचा खरीप हंगामातील बीजोत्पादनालाही फटका बसला आहे.

कोट....

गतवर्षी झालेल्या अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा खरिपात बियाणे तुटवड्याची शक्यता पाहता, शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची घेतलेली आहे. सध्या हे सोयाबीन चांगल्या स्थितीत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा बियाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे नवीन वाण शेतकऱ्यांना मिळेल.

-सी.पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा

१,४३,७२४

नुकसानग्रस्त शेतकरी

पीकनिहाय नुकसान हेक्टरमध्ये

सोयाबीन ४१,२८७.३

मका ३२७.५४

कापूस २४,५२४.७८

तूर ४,५४१.३९

उडीद ३,४८८.५१

मूग १८,९३०.८२