शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बियाणे टंचाईवर उन्हाळी सोयाबीनची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 12:01 IST

Agriculture News जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग राबविण्यात येत आहे

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बीजोत्पादनात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे; परंतु खरीप हंगामात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ९४ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानामुळे यंदा बियाणे तुटवड्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. बियाणेटंचाईवर ही पेरणी महत्त्वाची मात्रा ठरेल, असा अंदाज आहे.राज्यात वाशिम, हिंगोली, परभणी आणि बुलडाणा, या चार जिल्ह्यांत प्रामुख्याने बीजोत्पादन सर्वाधिक होते. बीजोत्पादनातून जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना वर्षाकाठी तब्बल ५२ कोटी रुपयांचा मोबदला मिळत आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात १ लाख ७४ हजार क्विंटल बीजोत्पादनाचे उद्दिष्ट होते; परंतु अतिपावसामुळे या बीजोत्पादनावरही परिणाम झाला. जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ९४ हजार १३३.३७ हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात गेले. गतवर्षी निकृष्ट बियाण्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता. येत्या खरीप हंगामातील बियाणेटंचाईची शक्यता पाहता, कृषी विभागाकडून उन्हाळी पेरणीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा उन्हाळी सोयाबीन बियाणेटंचाईवर महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. उन्हाळ्यात झडती लागत नाही. त्यामुळे शक्यतो पेरणी केली जात नाही; परंतु यंदा बियाणेटंचाई पाहता, अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनला पसंती दिली आहे. 

दरम्यान यंदा प्रथमच उन्हाळी साेयाबीन घेण्याचा प्रयाेग जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्याचा कितपत लाभ हाेताे हे नंतर कळेल.गतवर्षी झालेल्या अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा खरिपात बियाणे तुटवड्याची शक्यता पाहता, शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची घेतलेली आहे. सध्या हे सोयाबीन चांगल्या स्थितीत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा बियाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे नवीन वाण शेतकऱ्यांना मिळेल.-सी.पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा