शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मोताळ्याला उन्हाचा तडाखा

By admin | Updated: April 20, 2017 23:50 IST

मोताळा : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने तालुकावासीयांची तगमग होत आहे.

मोताळा : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने तालुकावासीयांची तगमग होत आहे. सकाळपासूनच जाणवणाऱ्या उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही होणार उकाडा त्यात भर घालत असल्याने मे महिन्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अनेकांकडून वर्तविली जात आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या उन्हाचा तडाखा तालुकाभरात तीव्र असून, १९ एप्रिल रोजी मोताळा शहराच्या तापमानाने ४३ अंश सेल्सिअस टप्पा गाठला आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, मागील पंधरवड्यापासून तापमानाचा आलेख उंचावत आहे. दिवसा ३९ ते ४४ अंश सेल्सिअश, तर संध्याकाळी २२ ते २५ अंश सेल्सिअशपर्यंत तापमान राहत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील वाढत्या उन्हाच्या झळांनी सर्व नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तापमान सकाळ-संध्याकाळ कायम राहत असल्यामुळे आग ओकणाऱ्या सूर्याची तीव्रता सहन करावी लागत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून, वाढत्या उष्णतेचा आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हाबरोबरच कमी दाबाचा परिणाम निघाल्यावर असह्य उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. तापमान वाढल्यामुळे शहरातील व्यापार मंदावला आहे. वाढत्या उन्हामुळे वन्य जीवांची होरपळ होत असल्याने वन्य जीव पाण्याच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आदी विषाणूजन्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या झळा डोळ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य होत आहेत. जिकडे-तिकडे शुकशुकाट दिसून येत असून, दुपारचे ऊन टाळून अनेक जण सायंकाळी खरेदी करणे पसंत करीत आहेत. वाढत्या तापमानामुळे थंडपेयाची विक्री वाढली असून, घरोघरी कुलर, पंख्याचा वापर वाढला आहे. कोल्ड्रिंक, रसवंती, आईस्क्रिम, ज्यूस सेंटरवर गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या तडाख्याने उष्माघात, साथ रोगाची शक्यता अधिक असते. तीव्र उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य होऊन संचार बंदी लागल्यासारखे दिसून येत आहेत. उन्हात फिरणाऱ्यांना उष्माघात होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हापासून स्वत:चा बचाव करण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.