शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पालिकेच्या व्यापारी संकुलाचे ग्रहण सुटता सुटेना!

By admin | Updated: April 26, 2017 00:59 IST

पाच वर्षांपासून रखडला लिलाव : विरोधी पक्षाचा तिढा कायम

खामगाव: नगरपालिका इमारतीनजीक आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलाचे ग्रहण सुटता-सुटत नसल्याचे चित्र दिसून आहे. गेल्या पाच वर्षांपासून तयार अवस्थेत असलेल्या या व्यापारी संकुलाच्या लिलावाची प्रक्रिया रखडली असून, निर्मितीपासूनच ‘विरोधी’ पक्षाच्या रडारवर हे व्यापारी संकुल सापडले आहे. याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या खामगाव शहरात नगरपालिका प्रशासनाच्यावतीने केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली. खामगाव नगरपालिकेच्या अद्ययावत प्रशासकीय वास्तुला लागूनच पालिकेचे व्यापारी संकुल उभारण्यात आले. आयडीएसएमटी योजनेंतर्गत सन २०११-१२ या आर्थिक वर्षांत मंजुरी मिळालेल्या या संकुलातील २९ गाळ्यांचे बांधकाम सन २०१२-१३ मध्ये पुर्णत्वास आले. त्याचवेळी संबंधित कंत्राटदाराकडून या व्यापारी संकुलाचे पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले; मात्र या व्यापारी संकुलाच्या लिलावाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या या व्यापारी संकुलाचा लिलाव रखडला आहे. या व्यापारी संकुलावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आलटून-पालटून राजकीय ‘खेळ’ रंगत आहे. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, लक्षावधी रुपयांच्या कराचेही नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती आहे. याकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोट्यवधींचा खर्च!खामगाव नगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा एक भाग म्हणून २९ गाळे असलेल्या व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली; मात्र गेल्या पाच वर्षांपासून या व्यापारी सुंकलाच्या लिलावाचे ग्रहण सुटत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या व्यापारी संकुलाच्या निर्मितीसाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विरोधासाठी राजकारण!व्यापारी संकुलाच्या निर्मितीपासूनच विरोधी पक्षाकडून या व्यापारी संकुलाला लक्ष्य केले जात आहे. पालिकेत नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर २८ फेब्रुवारी २०१७ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक २७ नुसार व्यापारी संकुलाचा विषय सभेसमोर ठेवण्यात आला; मात्र विरोधकांनी या विषयाला आक्षेप नोंदविला. उल्लेखनीय म्हणजे या आधी सत्तेवर असलेल्या सध्याच्या विरोधकांनीसुद्धा दोन वर्षांपर्वी व्यापारी संकुल हर्रासीचा ठराव मांडला होता. त्यावेळी आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. नुकसानात भर!व्यापारी संकुलातील २९ गाळ्यांचा लिलाव लालफितशाहीत रखडला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या व्यापारी संकुलापासून मिळणाऱ्या भाड्यापोटी आणि करापोटीच्या उत्पन्नापासून पालिकेला वंचित रहावे लागत आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भाड्याचे नुकसान झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.