शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

पालिकेच्या व्यापारी संकुलाचे ग्रहण सुटता सुटेना!

By admin | Updated: April 26, 2017 00:59 IST

पाच वर्षांपासून रखडला लिलाव : विरोधी पक्षाचा तिढा कायम

खामगाव: नगरपालिका इमारतीनजीक आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलाचे ग्रहण सुटता-सुटत नसल्याचे चित्र दिसून आहे. गेल्या पाच वर्षांपासून तयार अवस्थेत असलेल्या या व्यापारी संकुलाच्या लिलावाची प्रक्रिया रखडली असून, निर्मितीपासूनच ‘विरोधी’ पक्षाच्या रडारवर हे व्यापारी संकुल सापडले आहे. याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या खामगाव शहरात नगरपालिका प्रशासनाच्यावतीने केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली. खामगाव नगरपालिकेच्या अद्ययावत प्रशासकीय वास्तुला लागूनच पालिकेचे व्यापारी संकुल उभारण्यात आले. आयडीएसएमटी योजनेंतर्गत सन २०११-१२ या आर्थिक वर्षांत मंजुरी मिळालेल्या या संकुलातील २९ गाळ्यांचे बांधकाम सन २०१२-१३ मध्ये पुर्णत्वास आले. त्याचवेळी संबंधित कंत्राटदाराकडून या व्यापारी संकुलाचे पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले; मात्र या व्यापारी संकुलाच्या लिलावाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या या व्यापारी संकुलाचा लिलाव रखडला आहे. या व्यापारी संकुलावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आलटून-पालटून राजकीय ‘खेळ’ रंगत आहे. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, लक्षावधी रुपयांच्या कराचेही नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती आहे. याकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोट्यवधींचा खर्च!खामगाव नगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा एक भाग म्हणून २९ गाळे असलेल्या व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली; मात्र गेल्या पाच वर्षांपासून या व्यापारी सुंकलाच्या लिलावाचे ग्रहण सुटत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या व्यापारी संकुलाच्या निर्मितीसाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विरोधासाठी राजकारण!व्यापारी संकुलाच्या निर्मितीपासूनच विरोधी पक्षाकडून या व्यापारी संकुलाला लक्ष्य केले जात आहे. पालिकेत नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर २८ फेब्रुवारी २०१७ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक २७ नुसार व्यापारी संकुलाचा विषय सभेसमोर ठेवण्यात आला; मात्र विरोधकांनी या विषयाला आक्षेप नोंदविला. उल्लेखनीय म्हणजे या आधी सत्तेवर असलेल्या सध्याच्या विरोधकांनीसुद्धा दोन वर्षांपर्वी व्यापारी संकुल हर्रासीचा ठराव मांडला होता. त्यावेळी आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. नुकसानात भर!व्यापारी संकुलातील २९ गाळ्यांचा लिलाव लालफितशाहीत रखडला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या व्यापारी संकुलापासून मिळणाऱ्या भाड्यापोटी आणि करापोटीच्या उत्पन्नापासून पालिकेला वंचित रहावे लागत आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भाड्याचे नुकसान झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.