शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

२१ आत्महत्या ठरल्या मदतीस पात्र!

By admin | Updated: May 1, 2016 01:27 IST

बुलडाणा जिल्ह्यात १९ हजार ८00 शेतकरी तणावग्रस्त असल्याचे वास्तव.

बुलडाणा: शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ात राबविण्यात येणार्‍या पथदश्री प्रकल्पांतर्गत बुलडाणा जिल्ह्या तील तणावग्रस्त शेतकर्‍यांचे सर्वेक्षण ऑक्टोबरमध्येच पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १९ हजार ८00 शे तकरी तणावग्रस्त असल्याचे वास्तव समोर आल्यावरही हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे धूळ खात आहे. दरम्यान, या वर्षातील पहिल्या चार महिन्यातच ४५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, ३0 एप्रिल रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत २१ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या आहेत. उर्वरि त प्रस्ताव चौकशीवर असून, त्यांनाही त्वरित मदत मिळणे आवश्यक आहे.अत्यल्प पावसामुळे यावर्षी पुन्हा सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. अत्यल्प उत्पादनामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे दर महिन्याला शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस् त जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने घोषित केलेल्या विविध उपायांमध्ये शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण करून तणावग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पथदश्री प्रकल्प राबविण्यात ये त आहे. या प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण पूर्ण झाले. जिल्ह्यातील १ हजार ४२0 गावांपैकी १३७ उजाड गावे वगळता १ हजार २८३ गावांमध्ये महसूल विभागाने हे सर्वेक्षण केले. यामध्ये १९ हजार ८00 शेतकरी तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे.