शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

शेतकरी दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:24 IST

तालुक्यातील कारखेड येथील शेषराव भगवान मंजुळकर (वय ६०) आणि जनाबाई शेषराव मंजुळकर (५१) या शेतकरी दाम्पत्याने तिबार पेरणीचे संकट ...

तालुक्यातील कारखेड येथील शेषराव भगवान मंजुळकर (वय ६०) आणि जनाबाई शेषराव मंजुळकर (५१) या शेतकरी दाम्पत्याने तिबार पेरणीचे संकट उद्भवल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेत ७ जुलैच्या रात्री विषारी औषध प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ८ जुलैच्या रात्री ९ व २ वाजण्याच्या सुमारास एकापाठोपाठ एक याप्रमाणे या शेतकरी दाम्पत्याची प्राणज्योत मालवली. मृत शेतकरी दाम्पत्याकडे केवळ दोन एकर शेती होती. गाठीशी असलेले सर्वकाही पणाला लावून त्यांनी पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही. त्यामुळे उसनवारी करून दुबार पेरणी त्यांना करावी लागली होती. मात्र, दुसऱ्यांदाही पेरणी उलटल्याने हे शेतकरी दाम्पत्य तणावाखाली होते. त्यातच मृत जनाबाई मंजुळकर यांना अर्धांगवायूचाही त्रास होता. मात्र, कसेबसे जीवन कंठत असताना निसर्गाने घोर निराशा केल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. मृत शेतकरी दाम्पत्यास दोन मुले व चार मुली आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.