शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानातून दोन वर्षांपासून साखर गायब!

By admin | Updated: April 18, 2017 00:55 IST

गोरगरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळणे दुरापास्त

किशोर मापारी - लोणार धान्य घोटाळ्याने प्रसिद्धीच्या झोतात राहत असलेल्या तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था अद्यापही सुधरायला तयार नाही. धान्य बेपत्ता होत असून, तालुक्यातील दुकानांना जोडलेल्या गावांमध्ये कधी धान्य वितरण होते, हा संशोधनाचा विषय आहे. गत दोन वर्षांपासून तालुक्यातून साखर हद्दपार झाल्याचे दिसून येते. या प्रकारावर कुणाचाही अंकुश नसल्याने गोरगरीब धान्यापासून वंचित राहात आहेत.तालुक्यात ३३ हजार ३१४ रेशन कार्डधारक आहे. या रेशनकार्डधारकांना ९६ दुकानांमधून स्वस्त धान्याची वितरण प्रणाली आहे. यामध्ये एपीएल शेतकरी ७५९१, एपीएल प्राधान्य ५७१८, बीपीएल ९६२०, अंत्योदय ६४२७, स्पेशल एपीएल ३६४१, शुभ्र १९३ आणि अन्नपूर्णा १२४ रेशनकार्डधारक आहेत. एपीएल शेतकरी, एपीएल प्राधान्य रेशनकार्डधारकांना गहू , तांदूळ तर बीपीएल व अंत्योदयधारकांना गहू, तांदूळ, साखर वाटप करणे बंधनकारक असताना कधी गहू तर कधी तांदूळ यावरच रेशनकार्डधारकांना भागवावे लागत आहे. यामध्ये साखर तर हद्दपारच झाली आहे. धान्य वितरण प्रणालीमध्ये सुधारणा केली असली तरी त्यामध्येही थोडेफार धान्य गावात पाठविले जाते आणि इतर धान्य काळ्या बाजारात विकले जाते. नेमके धान्य वितरणासाठी कधी येते आणि कोण वितरित करतो, हे कळत नाही. धान्य वितरणासाठी आल्यानंतर ग्रामपंचायतला सूचना देऊन दवंडी देणे गरजेचे आहे किंवा काही नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविणे गरजेचे आहे; मात्र असा कोणताही प्रकार होत नाही. दुपारच्या वेळी मजूर आणि शेतकरी शेतात गेल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार धान्य घेऊन येतात आणि वितरण केल्याचा देखावा करतात. याबाबत अनेकांनी तहसील व पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु कोणतीही उपाययोजना झालेली नाही. जि. प. व पं.स. निवडणुकी दरम्यान अधिकारी वर्ग निवडणुकीत गुंतला असताना तालुक्यातील ९० टक्के दुकानदारांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोरगुरबांचा तोंडचा घास काळ्या बाजारात नेऊन विकला आहे. यामध्ये लोणार गोदाम पालक यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केली आहे. अन्न धान्य घेण्यासाठी गेलेल्या अनेकांना माल आलाच नाही, अशी भूलथाप दुकानदाराकडून दिली जाते. यामध्ये तालुक्यातील अधिकारी यांचे संगनमत असल्यामुळे कोणत्याही दुकानदारांवर कारवाई केल्या जात नाही. ‘ना खाऊंगा ना खाणे दूंगा’ असे ब्रीद वाक्य विद्यमान सरकारचे असतानाही हा घोटाळा थांबवावा, अशी मागणी राजेश मापारी यांनी अन्न पुरवठा ग्राहक सरंक्षण मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. गोरगरिबांना अन्न मिळावे, यासाठी योजना सुरु केल्या आहेत; परंतु काही अधिकारी आर्थिक हितासाठी योजनेला तिलांजली देत असून, गरिबांच्या तोंडचा घास हिसकावून घेत आहेत. रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य मिळालेच पाहिजे.- राजेश मापारी, जि.प.सदस्य, लोणार.धान्य वितरणमध्ये घोटाळा झाल्याबाबत कोणतीही कल्पना नाही. सदर तक्रारीबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.- ए. एफ. सय्यद , पुरवठा निरीक्षण अधिकारी,लोणार.