शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

स्वस्त धान्य दुकानातून दोन वर्षांपासून साखर गायब!

By admin | Updated: April 18, 2017 00:55 IST

गोरगरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळणे दुरापास्त

किशोर मापारी - लोणार धान्य घोटाळ्याने प्रसिद्धीच्या झोतात राहत असलेल्या तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था अद्यापही सुधरायला तयार नाही. धान्य बेपत्ता होत असून, तालुक्यातील दुकानांना जोडलेल्या गावांमध्ये कधी धान्य वितरण होते, हा संशोधनाचा विषय आहे. गत दोन वर्षांपासून तालुक्यातून साखर हद्दपार झाल्याचे दिसून येते. या प्रकारावर कुणाचाही अंकुश नसल्याने गोरगरीब धान्यापासून वंचित राहात आहेत.तालुक्यात ३३ हजार ३१४ रेशन कार्डधारक आहे. या रेशनकार्डधारकांना ९६ दुकानांमधून स्वस्त धान्याची वितरण प्रणाली आहे. यामध्ये एपीएल शेतकरी ७५९१, एपीएल प्राधान्य ५७१८, बीपीएल ९६२०, अंत्योदय ६४२७, स्पेशल एपीएल ३६४१, शुभ्र १९३ आणि अन्नपूर्णा १२४ रेशनकार्डधारक आहेत. एपीएल शेतकरी, एपीएल प्राधान्य रेशनकार्डधारकांना गहू , तांदूळ तर बीपीएल व अंत्योदयधारकांना गहू, तांदूळ, साखर वाटप करणे बंधनकारक असताना कधी गहू तर कधी तांदूळ यावरच रेशनकार्डधारकांना भागवावे लागत आहे. यामध्ये साखर तर हद्दपारच झाली आहे. धान्य वितरण प्रणालीमध्ये सुधारणा केली असली तरी त्यामध्येही थोडेफार धान्य गावात पाठविले जाते आणि इतर धान्य काळ्या बाजारात विकले जाते. नेमके धान्य वितरणासाठी कधी येते आणि कोण वितरित करतो, हे कळत नाही. धान्य वितरणासाठी आल्यानंतर ग्रामपंचायतला सूचना देऊन दवंडी देणे गरजेचे आहे किंवा काही नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविणे गरजेचे आहे; मात्र असा कोणताही प्रकार होत नाही. दुपारच्या वेळी मजूर आणि शेतकरी शेतात गेल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार धान्य घेऊन येतात आणि वितरण केल्याचा देखावा करतात. याबाबत अनेकांनी तहसील व पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु कोणतीही उपाययोजना झालेली नाही. जि. प. व पं.स. निवडणुकी दरम्यान अधिकारी वर्ग निवडणुकीत गुंतला असताना तालुक्यातील ९० टक्के दुकानदारांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोरगुरबांचा तोंडचा घास काळ्या बाजारात नेऊन विकला आहे. यामध्ये लोणार गोदाम पालक यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केली आहे. अन्न धान्य घेण्यासाठी गेलेल्या अनेकांना माल आलाच नाही, अशी भूलथाप दुकानदाराकडून दिली जाते. यामध्ये तालुक्यातील अधिकारी यांचे संगनमत असल्यामुळे कोणत्याही दुकानदारांवर कारवाई केल्या जात नाही. ‘ना खाऊंगा ना खाणे दूंगा’ असे ब्रीद वाक्य विद्यमान सरकारचे असतानाही हा घोटाळा थांबवावा, अशी मागणी राजेश मापारी यांनी अन्न पुरवठा ग्राहक सरंक्षण मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. गोरगरिबांना अन्न मिळावे, यासाठी योजना सुरु केल्या आहेत; परंतु काही अधिकारी आर्थिक हितासाठी योजनेला तिलांजली देत असून, गरिबांच्या तोंडचा घास हिसकावून घेत आहेत. रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य मिळालेच पाहिजे.- राजेश मापारी, जि.प.सदस्य, लोणार.धान्य वितरणमध्ये घोटाळा झाल्याबाबत कोणतीही कल्पना नाही. सदर तक्रारीबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.- ए. एफ. सय्यद , पुरवठा निरीक्षण अधिकारी,लोणार.