शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: March 13, 2015 01:47 IST

सहा महिन्यांत पिकांचे नुकसान : आठ हजार मि.मी. पावसाची नोंद

बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली. २0१४ च्या जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांत झालेल्या अतवृष्टीच्या फटक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाळा सरल्यानंतरही उन्हाळ्याच्या मार्चपर्यत प्रत्येक महिन्यात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा जिल्ह्यासाठी दहा महिन्यांचा ठरला आहे. या दरम्यान ८ हजार १७९.९२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी पावसाळ्यानंतरच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ७४ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रातील सोयबीन, कापूस, ज्वारी, कांदा, मका, तूर, मूग आदी खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले.दरवर्षीपेक्षा यावर्षी चांगल्या पावसाने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला, मात्र सप्टेंबर २0१४ च्या शेवटपर्यत सरसरीपेक्षा जास्त पाऊस आल्याने नदी-नाल्यांना पूर आला. जून तसेच सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मोठे नुकसान झाले. पावसाने शेवटच्या टप्प्यात सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १६ हजार शेतकर्‍यांना पावसाचा मोठा फटका बसला. बर्‍याच ठिकाणी उभी पिके झोपली, तर काही ठिकाणी संपूर्ण शेती खरडून निघाली. वर्ष संपताना नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेल्या गारांसह पावसाने १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत दमदार हजेरी लावली. आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्‍यांचे रब्बी पीकही हातातून गेले. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांना मोठा फटका बसला. ३१ डिसेंबर २0१४ आणि १ व २ जानेवारी २0१५ या तीन दिवसांत अवकाळी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यात १५ हजार ४४३ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे नोंदविण्यात आली. यात रब्बी पिकातील हरभरा, तूर, ज्वारी, गहू, कांदा, मका तसेच बागायती क्षेत्राचे नुकसान झाले. पावसाची ही अनियमितता यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यातही कायम आहे. फेब्रुवारी महिन्यात ११ व २८ तारखेला तसेच १ आणि ११ मार्च या चार दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ४0 टक्के पिकांचे व बागायती पिकांच्या बहराचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागात नोंदविण्यात आली. या चार दिवसांच्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा, मोताळा तालुक्यातील आंबा, गहू, कांदा व हरभरा पिकांचे नुकसान झाले, तर खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यांमध्ये सोंगणीला आलेला गहू, हरभरा तसेच सोंगून ठेवलेले पिकांचे तसेच काही प्रमाणात कृषिमालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.