शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: March 13, 2015 01:47 IST

सहा महिन्यांत पिकांचे नुकसान : आठ हजार मि.मी. पावसाची नोंद

बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली. २0१४ च्या जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांत झालेल्या अतवृष्टीच्या फटक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाळा सरल्यानंतरही उन्हाळ्याच्या मार्चपर्यत प्रत्येक महिन्यात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा जिल्ह्यासाठी दहा महिन्यांचा ठरला आहे. या दरम्यान ८ हजार १७९.९२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी पावसाळ्यानंतरच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ७४ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रातील सोयबीन, कापूस, ज्वारी, कांदा, मका, तूर, मूग आदी खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले.दरवर्षीपेक्षा यावर्षी चांगल्या पावसाने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला, मात्र सप्टेंबर २0१४ च्या शेवटपर्यत सरसरीपेक्षा जास्त पाऊस आल्याने नदी-नाल्यांना पूर आला. जून तसेच सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मोठे नुकसान झाले. पावसाने शेवटच्या टप्प्यात सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १६ हजार शेतकर्‍यांना पावसाचा मोठा फटका बसला. बर्‍याच ठिकाणी उभी पिके झोपली, तर काही ठिकाणी संपूर्ण शेती खरडून निघाली. वर्ष संपताना नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेल्या गारांसह पावसाने १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत दमदार हजेरी लावली. आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्‍यांचे रब्बी पीकही हातातून गेले. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांना मोठा फटका बसला. ३१ डिसेंबर २0१४ आणि १ व २ जानेवारी २0१५ या तीन दिवसांत अवकाळी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यात १५ हजार ४४३ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे नोंदविण्यात आली. यात रब्बी पिकातील हरभरा, तूर, ज्वारी, गहू, कांदा, मका तसेच बागायती क्षेत्राचे नुकसान झाले. पावसाची ही अनियमितता यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यातही कायम आहे. फेब्रुवारी महिन्यात ११ व २८ तारखेला तसेच १ आणि ११ मार्च या चार दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ४0 टक्के पिकांचे व बागायती पिकांच्या बहराचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागात नोंदविण्यात आली. या चार दिवसांच्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा, मोताळा तालुक्यातील आंबा, गहू, कांदा व हरभरा पिकांचे नुकसान झाले, तर खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यांमध्ये सोंगणीला आलेला गहू, हरभरा तसेच सोंगून ठेवलेले पिकांचे तसेच काही प्रमाणात कृषिमालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.