शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

अवकाळी पावसाचा वीटभट्टय़ांना फटका

By admin | Updated: April 16, 2015 01:10 IST

अवकाळी पावसामुळे वीटभट्टय़ांची मोठी हानी; विटांची कमतरताही जाणवण्याची शक्यता.

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): तालुक्यात सतत तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टय़ांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे भविष्यात विटांच्या भावात वाढ होऊन विटांची कमतरताही जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव जामोद तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या मानेगाव व झाडेगाव येथे वीटभट्टय़ांची संख्या मोठी आहे. या भट्टय़ांची वीट ही उत्तम असल्याने अकोला व बुलडाणा जिल्ह्यात अनेक गावांमध्ये व शहरात येथील वीट उत् पादनाला मोठी मागणी असते; परंतु यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांत अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वीट उत्पादकांची मोठी हानी झाली. त्यातून सावरत एप्रिल महिन्यात मोठय़ा प्रमाणावर कच्ची वीट तयार करण्यात आली; परंतु ही वीट पक्की होण्यापूर्वीच १0, ११ व १२ एप्रिलला तालुक्यात प्रचंड अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे या भागातील सुमारे २५ वीट उत्पादकांनी तयार केलेल्या लाखो कच्च्या विटांची अक्षरश: माती झाली. काहींनी चट्टे तयार केले होते. त्यांचीही माती झाल्याने वीट उत्पादकांवर अक्षरश: आभाळ कोसळल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे सर्व वीट उत्पादक अत्यंत हवालदिल झाले आहे. झालेली हानी कशी भरून काढावी, हा त्यांच्यापुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या लेखी, हा व्यवसाय नुकसान भरपाईसाठी पात्र नसल्याचे समजते. वीट उत् पादनासाठी जी परवानगी आवश्यक असते, ती अनेक उत्पादकांकडे नाही. कारण प्रदूषणाच्या पृष्ठभूमीवर शासकीय अटी अत्यंत जाचक असल्याने रीतसर परवानगी मिळणे फार कठीण जाते. या व्यवसायाला पावसाचा जो फटका बसला, त्याकरिता शासनाने आर्थिक मदत करावी, अशी वीट उत्पादकांची मागणी आहे.