शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

 पैनगंगा नदीपात्रात वाहून जाणाऱ्या दोन मुलांना वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:11 IST

कल्याणा येथील हर्षल जनार्दन ठाकरे आणि दुधा येथील पंकज पंढरी लोढे ही दोन मुले थोडक्यात बचावली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: एकीकडे पेनटाकळी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असतानाच बैलांना पाणी पाजण्यासाठी बैलगाडीद्वारे पैनगंगा नदीपात्रात गेलेली दोन मुले बैलगाडीसह नदीपात्रात वाहून जाताजाता थोडक्यात बजावली. दुधा-ब्रम्हपुरी येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मुले थोडक्यात वाचली. मात्र या घटनेत बैलगाडीला जुंपलेला एक बैल मात्र ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.दरम्यान, नदीपात्रात वाहून गेलेली बैलगाडी व बैलांना वाचविण्यासाठी थेट पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्याची विनंती पाटबंधारे विभाच्या उपअभियंत्यांना करण्यात आली होती. अल्पावधीसाठी पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे नागरिकांना दोन्ही मुलांसह वाहून जाणारी बैलगाडी व एका बैलाला वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेत दैव बलवत्तर म्हणून वाचलेल्या मुलांमध्ये कल्याणा येथील हर्षल जनार्दन ठाकरे आणि दुधा येथील पंकज पंढरी लोढे ही दोन मुले थोडक्यात बचावली.कल्याणा येथील हर्षल जनार्दन ठाकरे हा पाचव्या वर्गात शिकणारा मुलगा दिवाळीसाठी दुधा येथे त्याचे मामा पंढरी लोढे यांच्याकडे यांच्याकडे आला होता. पंढरी लोढे यांचा मुलगा पंकज पंढरी लोढे हा दहाव्या वर्गामध्ये असून विवेकानंद मंदिरामध्ये तो शिकतो. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी हर्षल व पंकज हे दोघेजण बैलगाडीद्वारे दुधा येथील पैनगंगा नदीच्या पात्राकडे गेले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व पाण्याच्या धारेत आल्याने बैलगाडी सह दोघेही वाहू लागले. हा सर्व प्रकार नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी बघितला. त्यांनी आरडाओरड केल्याने नदीकाठावर असलेल्या दुधा, ब्रह्मपुरी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभिर्य पाहता प्रसंगावधान राखून काही नागरिकांनी नदीपात्रात उड्या मारून दोन्ही मुले व एका बैलास वाचविण्यात यश मिळवले. या ग्रामस्थामध्ये समाधान हैबती म्हस्के, शालिकराम महाकाळ, गुलाबराव इटिवाड, सुरेश इटिवाड, पंडितराव देशमुख, गौरव देशमुख, नागेश महाकाळ, प्रल्हाद दळवी, रवि पवार, सुनील शेषनारायण म्हस्के यांचा समावेश होता.दोन्ही मुलांची प्रकृती स्थिरपुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या दोन्ही मुलांना वाचविण्यात यश आले आहे. घटनेनंतर दोन्ही मुलांची हिवराआश्रम येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले. एका बैलालाही या घटनेदरम्यान वाचविण्यात आले. दुसरीकडे ही घटना घडली तेव्हा पेनटाकली प्रकल्पाचे तीन दरवाजे दहा सेमींने उघडलेले होते. तुलनेने पाण्याचा विसर्ग कमी होता. त्यामुळे पाणी नदीपात्रातच होते. मात्र बैलगाडी व मुले ही थेट नदीतील धारेच्या प्रवाहात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाriverनदी