शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

हगणदरी मुक्ततेसाठी खामगावला सबुरीचा सल्ला!

By admin | Updated: May 19, 2017 19:55 IST

खामगाव शहराची जिल्हा स्तरीय समितीकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत हगणदरी मुक्ततेसाठी खामगाव शहराला आता प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येते. खामगाव नगर पालिकेने हगणदरी मुक्त शहरासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर केल्यानंतर शुक्रवारी जिल्हा स्तरीय समितीमार्फत शहराची पाहणी करण्यात आली. यावेळी समितीने काही बाबींबर असमाधान व्यक्त केल्याचे समजते.

स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत खामगाव नगर पालिकेने शहर हगणदरीमुक्तीचा ठराव घेतला. या ठरावानुसार हगणदरी मुक्त शहर म्हणून पात्र ठरण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला. या प्रस्तावानुसार शुक्रवारी जिल्हा प्रशासन अधिकारी उदय कुरवलकर यांच्या नेतृत्वातील पथकाने शहराची पाहणी केली. या पाहणीत समितीने अनेक बाबींवर समाधान तर, काही बाबींवर असमाधान व्यक्त केले. त्याचवेळी खामगाव नगर पालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत उल्पावधीत केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचे कौतुकही जिल्हा स्तरीय समितीच्यावतीने करण्यात आले. या समितीमध्ये जिल्हा प्रशासन अधिकारी उदय कुरवलकर, खामगावचे उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, तहसीलदार सुनील पाटील यांचा सहभाग होता. यावेळी खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्यासह आरोग्य पर्यवेक्षिका पल्लवी इंगळे, आरोग्य निरिक्षक अनंत निळे, सुनील राजपूत, नागेश रोठे यांच्यासह खामगाव पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकातील सदस्यांची उपस्थिती आहे.या भागात झाली पाहणी!शहरातील उघड्यावर हगणदरी असलेल्या काही भागांची पाहणी केली. यामध्ये बाळापूर फैल, शंकर नगर, चांदमारी, माखरिया मैदान, हरिफैल आदी भागाचा समावेश होता. चिखली रोडवर देखील पथकाने भेट दिली.

हगणदरी मुक्तीसाठी सामुहिक प्रयत्नांची गरज!स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीसोबतच उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, शहरातील नागरिकांकडून या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सामाजिक संस्थांचाही स्वच्छ महाराष्ट्र अभियानात अपेक्षीत प्रतिसाद नसल्याची वस्तुस्थिती असून, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून या अभियानाकडे कानाडोळा केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ आणि हगणदरी मुक्त करण्यासाठी राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा होत आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत खामगाव पालिकेची प्रगती दिसून येत आहे. मात्र, अद्यापही काही बाबींवर पालिकेला लक्ष देण्याची गरज आहे. -उदय कुरवलकर, जिल्हा प्रशासन अधिकारी, बुलडाणा.