शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी मुकले निरोप समारंभाच्या गोड अनुभवाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

बुलडाणा: कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या नाही, तर अनेक सुवर्ण क्षणही विद्यार्थ्यांनी गमावले आहेत. यंदा परीक्षाच होणार नसल्याने ...

बुलडाणा: कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या नाही, तर अनेक सुवर्ण क्षणही विद्यार्थ्यांनी गमावले आहेत. यंदा परीक्षाच होणार नसल्याने विद्यार्थ्यांना निकालाची हुरहुर नाही किंवा त्यांच्या यशाचे कौतुकही होणार नाही. दहावी, बारावीचे हे विद्यार्थी शाळेत होणाऱ्या निरोप समारंभाच्या गोड अनुभवालाही मुकले आहेत. कोरोनामुळे अपेक्षाभंग झाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात निरोप समारंभाला अनन्यसाधारण महत्त्व असते. शाळेतील निरोप समारंभाच्या आठवणी मुले आयुष्यभर जपून ठेवतात. त्यानंतर, दहावी किंवा बारावीच्या परीक्षा, निकाल, यश, अपयक्ष हे अनुभवी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात, परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे दहावी, बारावीच्या मुलांच्या प्रत्येक सुवर्ण क्षणावर पाणी फेरले आहे. वर्षभर शाळा बंद असल्याने मुलांना ऑनलाइनवरचा शाळेचा अनुभव घ्यावा लागला. वर्षभर अभ्यास केल्यानंतरही परीक्षा होणार नसल्याने, काही विद्यार्थ्यांनी नाराजीही व्यक्ती केली आहे.

निरोप समारंभ खूप काही शिकवतो...

विद्यार्थ्यांना निरोप समारंभ हा खूप काही शिकवूण जात असतो. शिक्षक, मित्र, शाळा यांची ताटातूट, आनंदाचा क्षण, विद्यार्थ्यांचा उत्साह, आपण मोठे झाल्याची जाणीवही या समारंभातून होत असते. या कार्यक्रमाच्या आठवणी मुले जपून ठेवतात.

काय म्हणतात विद्यार्थी...

कोरोनाच्या महामारीमुळे आम्हाला यंदा शाळेत जाता आले नाही. शाळेत कुठलेच कार्यक्रम होऊ शकले नाही. वर्षभर ऑनलाइन अभ्यास केला, परंतु परीक्षा झाली नाही. अनेक क्षणापासून आम्ही मुकलो.

शिवरंजन मुळे.

आमचाही शाळेचा निरोप समारंभ थाटात होईल, सर्व मैत्रिणी एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करू, अशी अपेक्षा होती, परंतु कोरोनामुळे सर्व काही थांबले आहे.

खुशी शर्मा.

परीक्षा दिल्यानंतर निकालाची उत्सुकता काय असते, याचा अनुभव आम्हाला घेता आला नाही. यश मिळविल्यानंतर इतरांकडून होणारे कौतुकही यंदा होणार नाही. वर्षभर अभ्यास केल्यानंतरही परीक्षा झाली नाही. अनेक अनुभवापासून आम्ही दुरापास्त झालो.

मुस्कान परविन.

आमच्या शाळेत निरोप समारंभ मोठ्या थाटात होत असतो, परंतु कोरोनामुळे निरोप समारंभच नाही, तर शाळेतील विविध कार्यकामांचा अनुभवही आम्हाला घेता आला नाही.

उदय इंगळे.

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी

दहावी ४५,०६८

बारावी ३२,१०८