शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

विद्यार्थी मुकले निरोप समारंभाच्या गोड अनुभवाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

बुलडाणा: कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या नाही, तर अनेक सुवर्ण क्षणही विद्यार्थ्यांनी गमावले आहेत. यंदा परीक्षाच होणार नसल्याने ...

बुलडाणा: कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या नाही, तर अनेक सुवर्ण क्षणही विद्यार्थ्यांनी गमावले आहेत. यंदा परीक्षाच होणार नसल्याने विद्यार्थ्यांना निकालाची हुरहुर नाही किंवा त्यांच्या यशाचे कौतुकही होणार नाही. दहावी, बारावीचे हे विद्यार्थी शाळेत होणाऱ्या निरोप समारंभाच्या गोड अनुभवालाही मुकले आहेत. कोरोनामुळे अपेक्षाभंग झाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात निरोप समारंभाला अनन्यसाधारण महत्त्व असते. शाळेतील निरोप समारंभाच्या आठवणी मुले आयुष्यभर जपून ठेवतात. त्यानंतर, दहावी किंवा बारावीच्या परीक्षा, निकाल, यश, अपयक्ष हे अनुभवी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात, परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे दहावी, बारावीच्या मुलांच्या प्रत्येक सुवर्ण क्षणावर पाणी फेरले आहे. वर्षभर शाळा बंद असल्याने मुलांना ऑनलाइनवरचा शाळेचा अनुभव घ्यावा लागला. वर्षभर अभ्यास केल्यानंतरही परीक्षा होणार नसल्याने, काही विद्यार्थ्यांनी नाराजीही व्यक्ती केली आहे.

निरोप समारंभ खूप काही शिकवतो...

विद्यार्थ्यांना निरोप समारंभ हा खूप काही शिकवूण जात असतो. शिक्षक, मित्र, शाळा यांची ताटातूट, आनंदाचा क्षण, विद्यार्थ्यांचा उत्साह, आपण मोठे झाल्याची जाणीवही या समारंभातून होत असते. या कार्यक्रमाच्या आठवणी मुले जपून ठेवतात.

काय म्हणतात विद्यार्थी...

कोरोनाच्या महामारीमुळे आम्हाला यंदा शाळेत जाता आले नाही. शाळेत कुठलेच कार्यक्रम होऊ शकले नाही. वर्षभर ऑनलाइन अभ्यास केला, परंतु परीक्षा झाली नाही. अनेक क्षणापासून आम्ही मुकलो.

शिवरंजन मुळे.

आमचाही शाळेचा निरोप समारंभ थाटात होईल, सर्व मैत्रिणी एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करू, अशी अपेक्षा होती, परंतु कोरोनामुळे सर्व काही थांबले आहे.

खुशी शर्मा.

परीक्षा दिल्यानंतर निकालाची उत्सुकता काय असते, याचा अनुभव आम्हाला घेता आला नाही. यश मिळविल्यानंतर इतरांकडून होणारे कौतुकही यंदा होणार नाही. वर्षभर अभ्यास केल्यानंतरही परीक्षा झाली नाही. अनेक अनुभवापासून आम्ही दुरापास्त झालो.

मुस्कान परविन.

आमच्या शाळेत निरोप समारंभ मोठ्या थाटात होत असतो, परंतु कोरोनामुळे निरोप समारंभच नाही, तर शाळेतील विविध कार्यकामांचा अनुभवही आम्हाला घेता आला नाही.

उदय इंगळे.

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी

दहावी ४५,०६८

बारावी ३२,१०८