शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

विद्यार्थी मुकले निरोप समारंभाच्या गोड अनुभवाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

बुलडाणा: कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या नाही, तर अनेक सुवर्ण क्षणही विद्यार्थ्यांनी गमावले आहेत. यंदा परीक्षाच होणार नसल्याने ...

बुलडाणा: कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या नाही, तर अनेक सुवर्ण क्षणही विद्यार्थ्यांनी गमावले आहेत. यंदा परीक्षाच होणार नसल्याने विद्यार्थ्यांना निकालाची हुरहुर नाही किंवा त्यांच्या यशाचे कौतुकही होणार नाही. दहावी, बारावीचे हे विद्यार्थी शाळेत होणाऱ्या निरोप समारंभाच्या गोड अनुभवालाही मुकले आहेत. कोरोनामुळे अपेक्षाभंग झाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात निरोप समारंभाला अनन्यसाधारण महत्त्व असते. शाळेतील निरोप समारंभाच्या आठवणी मुले आयुष्यभर जपून ठेवतात. त्यानंतर, दहावी किंवा बारावीच्या परीक्षा, निकाल, यश, अपयक्ष हे अनुभवी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात, परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे दहावी, बारावीच्या मुलांच्या प्रत्येक सुवर्ण क्षणावर पाणी फेरले आहे. वर्षभर शाळा बंद असल्याने मुलांना ऑनलाइनवरचा शाळेचा अनुभव घ्यावा लागला. वर्षभर अभ्यास केल्यानंतरही परीक्षा होणार नसल्याने, काही विद्यार्थ्यांनी नाराजीही व्यक्ती केली आहे.

निरोप समारंभ खूप काही शिकवतो...

विद्यार्थ्यांना निरोप समारंभ हा खूप काही शिकवूण जात असतो. शिक्षक, मित्र, शाळा यांची ताटातूट, आनंदाचा क्षण, विद्यार्थ्यांचा उत्साह, आपण मोठे झाल्याची जाणीवही या समारंभातून होत असते. या कार्यक्रमाच्या आठवणी मुले जपून ठेवतात.

काय म्हणतात विद्यार्थी...

कोरोनाच्या महामारीमुळे आम्हाला यंदा शाळेत जाता आले नाही. शाळेत कुठलेच कार्यक्रम होऊ शकले नाही. वर्षभर ऑनलाइन अभ्यास केला, परंतु परीक्षा झाली नाही. अनेक क्षणापासून आम्ही मुकलो.

शिवरंजन मुळे.

आमचाही शाळेचा निरोप समारंभ थाटात होईल, सर्व मैत्रिणी एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करू, अशी अपेक्षा होती, परंतु कोरोनामुळे सर्व काही थांबले आहे.

खुशी शर्मा.

परीक्षा दिल्यानंतर निकालाची उत्सुकता काय असते, याचा अनुभव आम्हाला घेता आला नाही. यश मिळविल्यानंतर इतरांकडून होणारे कौतुकही यंदा होणार नाही. वर्षभर अभ्यास केल्यानंतरही परीक्षा झाली नाही. अनेक अनुभवापासून आम्ही दुरापास्त झालो.

मुस्कान परविन.

आमच्या शाळेत निरोप समारंभ मोठ्या थाटात होत असतो, परंतु कोरोनामुळे निरोप समारंभच नाही, तर शाळेतील विविध कार्यकामांचा अनुभवही आम्हाला घेता आला नाही.

उदय इंगळे.

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी

दहावी ४५,०६८

बारावी ३२,१०८