शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

विद्यार्थ्यांना पडला भागाकार, गुणाकाराचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मागील शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन शिकविण्यात गेले. मात्र या शिक्षणाचा म्हणावा तसा ...

मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मागील शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन शिकविण्यात गेले. मात्र या शिक्षणाचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल आले आणि मुले गेम व कार्टून पाहण्यात रमली; तर उरलेला वेळ टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यात घालवत आहेत.

शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसऱ्या वर्गापासूनच मुलांना उजळणी मुखोद्गत होऊ लागली. परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. इयत्ता पाचवीच्या मुलांना भागाकार व गुणाकार कसा करायचा, याचा विसर पडला आहे. जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले; परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, हेसुद्धा माहीत नाही. ऑनलाईन शिक्षण केवळ २० ते ३० टक्के विद्यार्थी प्रामाणिकपणे करीत असावेत; परंतु इतर विद्यार्थी मात्र या शिक्षणापासून वंचित आहेत. या वर्षी परीक्षा रद्द झाल्याने मुले बिनधास्त झाली असून, परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा? असे मुले म्हणताना दिसत आहेत. यंदा जून महिन्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन प्रवेश देण्यात आले. परंतु वर्षभर शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शाळा तर पाहिलीच नाही; परंतु गुरुजींची भेटसुद्धा झाली नाही. बाराखडीची अक्षरेसुद्धा गिरविली नाहीत, तरीही मुले आरटीई कायद्यातील नियमाप्रमाणे दुसरीत प्रविष्ट झाली आहेत.

पुढील काळात शिक्षकांना करावी लागणार कसरत

शाळास्तरावर विद्यार्थ्यांना दिशा ॲप, गुगल मिट यांसारख्या शैक्षणिक साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये नियमितपणा नव्हता. त्यामुळे ज्ञानाची पोकळी भरून काढण्यासाठी आता येणाऱ्या काळात शिक्षकांना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत. वर्षभरापासून मुले शाळेत जात नसल्याने त्यांना आता अभ्यासासोबतच शाळेचाही विसर पडला आहे. मुलांकडून अभ्यास करून घेण्याची मानसिकता पालकांचीही राहिली नाही. त्यामुळे हा काळ सर्वांसाठी कसोटीचा ठरत आहे.