शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विद्यार्थ्यांना पडला भागाकार, गुणाकाराचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मागील शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन शिकविण्यात गेले. मात्र या शिक्षणाचा म्हणावा तसा ...

मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मागील शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन शिकविण्यात गेले. मात्र या शिक्षणाचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल आले आणि मुले गेम व कार्टून पाहण्यात रमली; तर उरलेला वेळ टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यात घालवत आहेत.

शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसऱ्या वर्गापासूनच मुलांना उजळणी मुखोद्गत होऊ लागली. परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. इयत्ता पाचवीच्या मुलांना भागाकार व गुणाकार कसा करायचा, याचा विसर पडला आहे. जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले; परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, हेसुद्धा माहीत नाही. ऑनलाईन शिक्षण केवळ २० ते ३० टक्के विद्यार्थी प्रामाणिकपणे करीत असावेत; परंतु इतर विद्यार्थी मात्र या शिक्षणापासून वंचित आहेत. या वर्षी परीक्षा रद्द झाल्याने मुले बिनधास्त झाली असून, परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा? असे मुले म्हणताना दिसत आहेत. यंदा जून महिन्यात इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन प्रवेश देण्यात आले. परंतु वर्षभर शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शाळा तर पाहिलीच नाही; परंतु गुरुजींची भेटसुद्धा झाली नाही. बाराखडीची अक्षरेसुद्धा गिरविली नाहीत, तरीही मुले आरटीई कायद्यातील नियमाप्रमाणे दुसरीत प्रविष्ट झाली आहेत.

पुढील काळात शिक्षकांना करावी लागणार कसरत

शाळास्तरावर विद्यार्थ्यांना दिशा ॲप, गुगल मिट यांसारख्या शैक्षणिक साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये नियमितपणा नव्हता. त्यामुळे ज्ञानाची पोकळी भरून काढण्यासाठी आता येणाऱ्या काळात शिक्षकांना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत. वर्षभरापासून मुले शाळेत जात नसल्याने त्यांना आता अभ्यासासोबतच शाळेचाही विसर पडला आहे. मुलांकडून अभ्यास करून घेण्याची मानसिकता पालकांचीही राहिली नाही. त्यामुळे हा काळ सर्वांसाठी कसोटीचा ठरत आहे.