शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

शाळेत माहिती देताना विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती नाही

By admin | Updated: July 31, 2015 00:34 IST

शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी शिक्षणाधिका-यांसह गटशिक्षणाधिका-यांना ‘व्हीसी’द्वारे दिले निर्देश.

खामगाव (जि. बुलडाणा) : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार ह्यसरलह्ण योजनेंतर्गत भरण्यात येणार्‍या ऑनलाइन माहितीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा रक्तगट तसेच आधार क्रमांकाची माहिती देणे अनिवार्य नसल्याचे गुरुवारी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये स्पष्ट केले. ह्यसरलह्ण योजनेंतर्गत भरण्यात येणार्‍या ऑनलाइन माहितीमध्ये रक्तगट तसेच आधार क्रमांकाची माहिती देणे अनिवार्य असल्याचा अर्थ काढण्यात आला होता. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने सत समोर आणण्यासाठी शासननिर्णयातील तरतुदी प्रकाशित करताच रक्तगटाची माहिती सक्तीची नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. आता आधार कार्डचीही सक्ती नसल्याची बाब गुरुवारी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी स्पष्ट केली. जिल्ह्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळा, त्या शाळेमध्ये कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ह्यसरलह्ण प्रणालीद्वारे ऑनलाइन भरण्याचे काम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत सुरू आहे. या कार्यपद्धतीमुळे प्रत्येक संस्था, शिक्षक व विद्यार्थी यांची सर्व प्रकारची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. या अर्जामध्ये असलेल्या जवळपास ९0 रकान्यांपैकी केवळ १५ मुद्दय़ांचीच माहिती भरणे अपेक्षित आहे. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या दाखल खारीज रजिस्टरमध्ये आधीच समाविष्ट असल्याने सहज उपलब्ध आहे. या माहितीसोबतच रक्तगट व आधार कार्डची माहिती सरल प्रक्रियेत विचारली आहे. त्यामुळे अनेक शाळांनी रक्तगट तपासणी व आधार कार्डची सक्ती करून विद्यार्थ्यांना किंवा पालकांना वेठीस धरले होते. रक्तगट लिहिणे ऐच्छिक असल्याचे समोर आल्यावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प समन्वयक शिंदे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांशी संवाद साधला. आधार कार्डची सक्ती नको, असल्यास माहिती भरा, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.