शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

‘मानव विकास’च्या बससाठी विद्यार्थिनींचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:35 IST

बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या  विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 

ठळक मुद्देविद्यार्थिनींना शाळेत जावे लागते पायी बसफेरी सुरू करण्याची मागणीएसटीच्या विभागीय कार्यालयासमोर विद्यार्थिनींनी केले ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या  विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील विद्यार्थीनींसाठी एसटी प्रवासाची मोफत सेवा दिल्या गेली आहे, यात मानव विकास मिशन बस सेवा व अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास सेवा या दोन प्रवाससेवा फक्त शालेय विद्यार्थिनीसाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या आहेत. मात्र स्थानिक पातळीवर ही मोफत सेवा देण्यात एसटीचे अधिकारी कुचराई करताना दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील विद्यार्थीनी मोफतप्रवास सेवेपासुन वंचित आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद या गावातील शेकडो विद्यार्थीनी दररोज  शिक्षण घेण्यासाठी ५ किमी अंतरावरुन पायी जात आहेत. वारंवार एसटी महामंडळाकडे मागणी करूनही बस सेवा पुरविली गेली नाही.  किनगावराजा येथे शाळेत जाण्यासाठी जंगलातून पायी वारी करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्रस्त विद्यार्थीनी व पालकांनी सरळ जिल्हा मुख्यालयी धाव घेतली व विभागीय नियंत्रक अनिल मेहतर यांची भेट घेऊन तक्रार करीत मानव विकास मिशनच्या बस सेवा सुरु करण्याची मागणी केली.सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना शाळा सुटल्यानंतर सायंकाळी किनगावर राजा ते उमरद हा प्रवास जंगलातून पायी जावून पूर्ण करावा लागत आहे. पायी गावी परतावे लागत असल्याने पालकांनी यावेळी चिंता व्यक्त केली. आता तात्काळ बससेवा सुरु करून मुलींना न्याय द्यावा अशी मागणी पालकानी यावेळी केली आहे. आजपासून बससेवा सुरु केली नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप नेते विनोद वाघ यानी दिला आहे. हा प्रश्न फक्त एका जिल्ह्याचा नसून संपूर्ण राज्यातील विद्यार्थिनीचा आहे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विनोद वाघ यांनी केली आहे.