शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

‘मानव विकास’च्या बससाठी विद्यार्थिनींचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:35 IST

बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या  विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 

ठळक मुद्देविद्यार्थिनींना शाळेत जावे लागते पायी बसफेरी सुरू करण्याची मागणीएसटीच्या विभागीय कार्यालयासमोर विद्यार्थिनींनी केले ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या  विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील विद्यार्थीनींसाठी एसटी प्रवासाची मोफत सेवा दिल्या गेली आहे, यात मानव विकास मिशन बस सेवा व अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास सेवा या दोन प्रवाससेवा फक्त शालेय विद्यार्थिनीसाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या आहेत. मात्र स्थानिक पातळीवर ही मोफत सेवा देण्यात एसटीचे अधिकारी कुचराई करताना दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील विद्यार्थीनी मोफतप्रवास सेवेपासुन वंचित आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद या गावातील शेकडो विद्यार्थीनी दररोज  शिक्षण घेण्यासाठी ५ किमी अंतरावरुन पायी जात आहेत. वारंवार एसटी महामंडळाकडे मागणी करूनही बस सेवा पुरविली गेली नाही.  किनगावराजा येथे शाळेत जाण्यासाठी जंगलातून पायी वारी करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्रस्त विद्यार्थीनी व पालकांनी सरळ जिल्हा मुख्यालयी धाव घेतली व विभागीय नियंत्रक अनिल मेहतर यांची भेट घेऊन तक्रार करीत मानव विकास मिशनच्या बस सेवा सुरु करण्याची मागणी केली.सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना शाळा सुटल्यानंतर सायंकाळी किनगावर राजा ते उमरद हा प्रवास जंगलातून पायी जावून पूर्ण करावा लागत आहे. पायी गावी परतावे लागत असल्याने पालकांनी यावेळी चिंता व्यक्त केली. आता तात्काळ बससेवा सुरु करून मुलींना न्याय द्यावा अशी मागणी पालकानी यावेळी केली आहे. आजपासून बससेवा सुरु केली नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप नेते विनोद वाघ यानी दिला आहे. हा प्रश्न फक्त एका जिल्ह्याचा नसून संपूर्ण राज्यातील विद्यार्थिनीचा आहे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विनोद वाघ यांनी केली आहे.