शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

‘मानव विकास’च्या बससाठी विद्यार्थिनींचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:35 IST

बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या  विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 

ठळक मुद्देविद्यार्थिनींना शाळेत जावे लागते पायी बसफेरी सुरू करण्याची मागणीएसटीच्या विभागीय कार्यालयासमोर विद्यार्थिनींनी केले ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या  विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील विद्यार्थीनींसाठी एसटी प्रवासाची मोफत सेवा दिल्या गेली आहे, यात मानव विकास मिशन बस सेवा व अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास सेवा या दोन प्रवाससेवा फक्त शालेय विद्यार्थिनीसाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या आहेत. मात्र स्थानिक पातळीवर ही मोफत सेवा देण्यात एसटीचे अधिकारी कुचराई करताना दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील विद्यार्थीनी मोफतप्रवास सेवेपासुन वंचित आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद या गावातील शेकडो विद्यार्थीनी दररोज  शिक्षण घेण्यासाठी ५ किमी अंतरावरुन पायी जात आहेत. वारंवार एसटी महामंडळाकडे मागणी करूनही बस सेवा पुरविली गेली नाही.  किनगावराजा येथे शाळेत जाण्यासाठी जंगलातून पायी वारी करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्रस्त विद्यार्थीनी व पालकांनी सरळ जिल्हा मुख्यालयी धाव घेतली व विभागीय नियंत्रक अनिल मेहतर यांची भेट घेऊन तक्रार करीत मानव विकास मिशनच्या बस सेवा सुरु करण्याची मागणी केली.सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना शाळा सुटल्यानंतर सायंकाळी किनगावर राजा ते उमरद हा प्रवास जंगलातून पायी जावून पूर्ण करावा लागत आहे. पायी गावी परतावे लागत असल्याने पालकांनी यावेळी चिंता व्यक्त केली. आता तात्काळ बससेवा सुरु करून मुलींना न्याय द्यावा अशी मागणी पालकानी यावेळी केली आहे. आजपासून बससेवा सुरु केली नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप नेते विनोद वाघ यानी दिला आहे. हा प्रश्न फक्त एका जिल्ह्याचा नसून संपूर्ण राज्यातील विद्यार्थिनीचा आहे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विनोद वाघ यांनी केली आहे.