शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

ग्रामसेवकांना कामावर रूजू होण्याची सक्त ताकीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:52 IST

ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी ग्रामसेवकांना सक्त ताकिद देत कामावर रूजू न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ग्रामपंचायतीचे कामकाज पुर्णपणे खोळंबले असून ग्रामविकास थांबला आहे. याची दखल घेत ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी ग्रामसेवकांना सक्त ताकिद देत कामावर रूजू न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान हा आदेश अन्यायकारक असून शासनाच्या आदेशासह जिल्हा परिषदेने काढलेल्या आदेशाची होळी करण्यात येणार असल्याचे राज्य ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी सांगितले. ग्रामसेवकांनी विविध मागण्यासाठी कामबंद आंदोलन पुकारत ग्रामपंचायतीच्या चाब्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दिल्या आहे. सातव्या आयोगात वेतनश्रेणी तील त्रुटींची पूर्तता व्हावी, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, नवीन भरती प्रक्रियेत शैक्षणिक अर्हता पदवीधर अशी करावी अशा मागण्यांचे निवेदन देत आंदोलन सुरु केले. मात्र महिना होत आला तरी अद्याप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना कोणताही तोडगा निघाला नाही.यामुळे महिनाभरापासून गावगाडा ठप्प झाला आहे. ग्रामसेवक संघटना सुद्धा आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घ्यायला तयार नसल्याने ग्रामविकास विभागाचे उपसचिवांनी एका आदेशान्वये ग्रामसेवकांना ड्युटीवर हजर होण्याबाबत आदेश दिले आहेत. जे ग्रामसेवक डयुटीवर हजर होणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.उपसचिवांच््या आदेशानंतर जिल्हा परिषद पंचायत विभागाने ग्रामसेवकांना ताकिद दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले असून ग्रामसेवक संघटना तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसापासून ग्रामसेवकांचे प्रलंबीत मागण्यांसाठी विविध टप्प्यात आंदोलन सुरू होते. आता ग्रामसेवक मागण्यांच्या पुर्ततेसाठी आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

काही ठिकाणी मुख्याध्यापकांकडे प्रभार!ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रामिण भागातील कामकाज प्रभावित झाले आहे. अकोला, अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी मुख्याध्यापकांकडे प्रभार दिला आहे. एवढेच नाहीतर यादरम्यान ग्रामपंचायतच्या कामाची तपासणी करून अनियमितता आढळल्यास फौजदारी कारवाईचे निर्देश सुद्धा देण्यात आल्याने ग्रामसेवकांपुढील अडचणी वाढल्या आहेत.ग्रामसेवक संघटना आक्रमकग्रामविकास विभागाच्या सचिवाच्या आदेशानंतर बुलडाणा जिल्हा परिषद प्रशासनाने सुद्धा जिल्हयातील ग्रामसेवकांना तातडीने कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहे. अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

बुलडाणा, अकोला, अहमदनगर जिल्हयासह अनेक ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सक्तीचे आदेश देत ग्रामसेवकांवर दबाव टाकला आहे. पण न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सोमवारी सर्व पंचायत समितीच्या ठिकाणी सचिवांच्या आदेशासह गटविकास अधिकाºयांच्याही आदेशाची आम्ही होळी करणार आहोत.- प्रशांत जामोदे,राज्य सरचिटणीस, राज्य ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र.

ग्रामविकास विभागाचे उपसचिवांच्या आदेशान्वये जिल्हयातील सर्व ग्रामसेवकांना कामावर रूजू होण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. मात्र हा विषय शासनस्तरावरील असल्याने संप कधी मिटेल याबाबत सांगू शकत नाही.- संजय चोपडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जिल्हा परिषद बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव