शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण डाक कर्मचारी १६ ऑगस्टपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:08 IST

बुलडाणा : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतातील संपूर्ण ग्रामीण डाकसेवक १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

ठळक मुद्देग्रामीण डाकसेवकांना अद्याप खात्यामध्ये समाविष्ट केलेले नाहीतुटपुंजा पगारावर करावा लागतोय कुटुंबाचा उदरनिर्वाहविविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी बेमुदत संपाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतातील संपूर्ण ग्रामीण डाकसेवक १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. ब्रिटिश राजवटीने भारतात सुरू केलेल्या काही मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या टपाल खात्याने आजच्या अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेच्या काळातही आपले अस्तित्व जपण्याची धडपड कायम ठेवली आहे. टपाल विभागाला १५0 वर्षे होऊन गेलीत, तरीसुद्धा ग्रामीण डाकसेवकांना अद्याप खात्यामध्ये समाविष्ट केलेले नाही. तुटपुंजा पगारावर त्यांना कुटुंबाचा भार सांभाळावा लागत आहे. मागील केलेल्या संपाच्या आश्‍वासनाची वाट पाहता अद्याप खात्यामध्ये समाविष्ट केले नाही. मागील सरकारने ६0 वर्षांत ग्रामीण डाकसेवकांकडे लक्षच दिले नाही. तेव्हा संचारमंत्री सुषमा स्वराज व रामविलास पासवान होते. सध्या सरकार भाजपचेच आहे. कमलेशचंद्र कमिटीने सादर केलेल्या अहवालाला संचारमंत्र्यांनी मंजुरात दिलेली आहे व आपल्या शिफारशीची फाइल वित्तमंत्र्यांकडे पाठविण्यात आलेली आहे. अद्याप वित्तमंत्रालयाने मंजुरात दिली नाही. त्यामुळे जनरल सेक्रेटरी एस.एस. महादैवया दिल्ली यांनी १४ ऑगस्टपर्यंत काही न झाल्यास १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचे आदेश दिले आहे. सरकारला याआधी ३0 जून रोजी बेमुदत संपाची नोटिस दिलेली आहे.  यावेळी जीडीएस कमिटीचा अहवाल संघटनेने दिलेल्या सूचनानुसार लवकर लागू करा. जीडीएसला आठ घंटे काम देऊन खात्यात समाविष्ट करा. जीडीएसला पेन्शन योजना लागू करा. जीडीएसच्या टारगेटच्या नावाखाली शोषण बंद करा, आदी मागण्या पूर्ण संप करण्यात येणार असल्याची माहिती माजी अध्यक्ष अरुण भानुसे यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे व आपल्या जिल्ह्यात संप १00 टक्के यशस्वी करा, असे आवाहन अरुण भानुसे, कॉ.पी.एस. झाडोकार, कॉ.एस.एस. ढोणे, कॉ.डी.ओ.पाटील, कॉ.जी. आर. देशमुख, रवी निकम, रमेश भवर, दिलीप पाटील यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे.