शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

आरोग्य विभागाच्या अजब परीक्षेचा गजब गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

बुलडाणा : आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी राज्यभरात २५ आणि २६ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु परीक्षेच्या अगोदरच्या ...

बुलडाणा : आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी राज्यभरात २५ आणि २६ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. आरोग्य विभागाच्या अजब परीक्षेच्या गजब गोंधळामुळे परीक्षार्थींमधून रोष व्यक्त होत आहे. आरोग्य विभागातील या मेगाभरतीची प्रतीक्षा उमेदवारांना २०१९ पासून होती. अखेर २६ व २६ सप्टेंबरला आरोग्य विभागातील पदभरतीसाठी परीक्षा घेण्याला मुहूर्त मिळाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे या परीक्षेला उमेदवारांचा प्रतिसादही भरपूर होता; परंतु परीक्षा विभागाकडून वेळेवर परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही मुले परीक्षा देण्यासाठी दूरपर्यंत गेली होती. त्यांना परत यावे लागले. अनेक जण पैसे खर्च करून परीक्षा देण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यात गेले; परंतु परीक्षा रद्द झाल्याने त्यांचे पैसेही गेले आणि मानसिक त्रास झाला तो वेगळाच. आरोग्य विभागाच्या या परीक्षेवरून परीक्षार्थींनी संतप्त प्रतिक्रिया लोकमतकडे व्यक्त केल्या.

मी अमरावतीवरून परत आलो

माझी परीक्षा अमरावती जिल्ह्यातील बडनेर येथील केंद्रावर होती. मी परीक्षेच्या अगोदरच्या दिवशीच आम्ही बुलडाणा येथून निघालो होते; परंतु रात्री ११ वाजता परीक्षा रद्द झाल्याचे कळाले. त्यामुळे अमरावतीतून परत यावे लागले. यात पैसे तर गेलेच शिवाय मानसिक त्रासही झाला.

आसिफ शेख हुसेन, परीक्षार्थी.

राज्य सरकारचा निषेध...

आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया रात्री ऐन वेळेवर रद्द करून राज्यातील बेरोजगार युवक, युवतींना मानसिक व आर्थिक त्रास दिला. त्यामुळे या सरकारचा आम्ही सर्व उमेदवार निषेध करतो. परीक्षेचे नियोजन यापूर्वीच योग्य पद्धतीने करायला हवे होते.

प्रभाकर वाघमारे, सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघ, बुलडाणा.

अपघात होऊनही परीक्षेला गेलो...

माझे परीक्षा केंद्र अमरावती येथे होते. मी परीक्षेच्या एक दिवस अगोदरच बसने निघालो होते. त्या बसचा शनिवारी दुपारी बुलडाणा ते खामगाव रोडवर बोथा घाटात अपघात झाला, तरीसुद्धा आपल्याला परीक्षेला जायचेच म्हणून आम्ही सर्वजण घाबरलेल्या अवस्थेत दुसऱ्या बसने अमरावती येथे रात्री १०.३० वाजता पोहचलो; परंतु तिथे गेल्यानंतर रात्री परीक्षा रद्द झाल्याचे कळाले. हा वाईट अनुभव कधीही विसरणार नाही.

ज्ञानेश्वर मुळे

परीक्षा झाली नाही, सोयाबीनही पावसात गेले...

एक विद्यार्थी उसने पैसे घेऊन दोन जिल्ह्यांचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचला होता. बाहेर कुठे राहण्याची सोय नसल्याने त्या विद्यार्थ्याने बसस्थानकावरच रात्र काढली. गावाकडे जास्त पाऊस झाल्याने शेतातील सोयाबीनही वाहून गेले अन् परीक्षाही झाली नाही. आता घरी परीक्षाच झाली नाही, हे कसं सांगावं, असे अनेक प्रसंग या परीक्षेने समोर आले आहेत.

राजकीय पुढाऱ्यांच्या आरोपाच्या फैरी...

परीक्षा रद्दवरून विरोधी पक्षांचे पुढारीही आक्रमक झाल्याचे दिसून आले. शनिवारी रात्री काही बसस्थानकावर मुलांनी रात्रीच गोंधळ घातला. हा महाआघाडीचा महागोंधळ असल्याच्या प्रतिक्रिया लोकप्रतिनिधींनी केल्या.