शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेलगाव आटोळ येथे वादळी वाऱ्याचे थैमान

By admin | Updated: May 28, 2017 04:23 IST

पावसाच्या सरी कोसळल्या!

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यात २५ मे पासून वातावरणात बदल झाला आहे. २६ व २७ मे रोजी वादळी वार्यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे नागरिक थोडे सुखावले असले, तरी वादळी वार्यामुळे शेलगाव आटोळ येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे विद्युत पोल कोसळल्याने शेलगाव आटोळसह परिसरातील चार गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.सबस्टेशनची निर्मिती होऊन चार वष्रे उलटूनदेखील अपूर्ण कामांमुळे या बसस्टेशनवरून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण जनतेला मोठा त्रास सोसावा लागत आहे. शेलगाव आटोळ परिसरात वादळी वार्यामुळे शेलगाव आटोळ ३३ केव्ही सबस्टेशनच्या मुख्य वाहिनीच्या तारा अनेक ठिकाणी तुटून पडल्या. तसेच काही विद्युत पोल कोसळल्याने, या सबस्टेशनांतर्गत येणार्या चार गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या भागात नेहमीच विजेची समस्या उद्भवत असल्याने जनतेच्या मागणीवरून या ३३ केव्हीच्या विद्युत सबस्टेशनची गत चार वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी चिखली ते शेलगाव आटोळपर्यंत मुख्य वाहिनीसाठी पोलदेखील उभारण्यात आले आहेत. मात्र, पोल उभारणीनंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कालावधीतच यातील अनेक पोल कोसळले होते व त्या पश्चात आता पुन्हा विद्युत पोल कोसळल्याने या भागातील नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.