शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

Shivsena: रस्त्यावर येऊन दादागिरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आवरा, दानवेंचा संताप

By निलेश जोशी | Updated: September 16, 2022 18:32 IST

बुलढाण्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात मांडली भूमिका

बुलढाणा: येणारा काळ हा संघर्षाचा आहे. सत्ताधारीच रस्त्यावर येऊन दादागिरी करत आहे. मुंबई, हिंगोली आणि बुलढाण्यात त्याचा प्रत्यय आला आहे. कायदा व सुव्यवस्था सत्ताधारीच खराब करत आहे. त्यामुळे प्रथमत: या सत्ताधाऱ्यांनाच आवरण्याची आज अवश्यकता आहे. ही दादागिरी आवरली नाही तर दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल, अशी परखड भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी बुलढाण्यात मांडली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर प्रथमच ते बुलढाण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने आयोजित केलेल्या सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करत होते. स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात हा मेळावा झाला. गेल्या १५ दिवसापूर्वी बुलढाण्यात शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटातील राड्याच्या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबरच्या या मेळाव्याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागून होते. या मेळाव्यास जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा शिवसेना प्रमुख द्वय जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, छनग मेहेत्रे, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, महिला आघाडीच्या चंदा बढे, तालुका प्रमुख लखन गाडेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान पुढे बोलतांना ना. आंबादास दानवे म्हणाले की, मुंबई, हिंगोली आणि बुलढाण्यात सत्ताधारीच दादागिरी करत आहे. आ. सदा सरवणकरसह अन्य काहींचे उदाहरन देत कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम या सत्ताधाऱ्यांकडूनच होत आहे. पोलिसही सत्ताधाऱ्यांच्या दबावात ते काम करत अवैध व्यवसायांना उत्तेजन देत आहेत. तर दुसरीकडे साथ दिली नाही म्हणून या सत्ताधाऱ्यांकडून ग्रामपंचायतींच्या चौकश्या लावल्या जात आहे. आम्हीही पालिकेतील अनधिकृत कारभाराची चौकशी लावू शकतो, असे दानवे पुढे म्हणाले. तसेच गद्दारांना गद्दार म्हणणार नाही तर काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गेल्या काळात आताचे उपमुख्यमंत्री व पुर्वाश्रमीचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोबण्याची भाषा करणारे आज आपल्या पोस्टवर त्यांचा फोटो लावत आहे. विचारधारेचा हा फरक आहे. शिवसेनेशी खेटण्याचा प्रयत्न करू नका. सत्ता येते सत्ता जाते. आज आपल्याजवळ येथे लोकप्रतिनिधी नसला तरी लोकप्रतिनिधी बनविणारी जनता आपल्या सोबत असतानाच शिवसेनेचा विचारही आहे. त्यामुळे येणारा काळ हा आपलाच असल्याचे दानवे म्हणाले. 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेHingoliहिंगोली