शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

शेतकऱ्यांची टोलवाटोलवी त्वरित थांबवा : सत्येंद्र भुसारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST

यानुषंगाने दिलेल्या निवेदनात डॉ. भुसारी यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री किसान साहाय्यता योजनेबाबत तहसील कार्यालय व कृषी विभाग या ...

यानुषंगाने दिलेल्या निवेदनात डॉ. भुसारी यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री किसान साहाय्यता योजनेबाबत तहसील कार्यालय व कृषी विभाग या दोन शासकीय कार्यालयातील श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रधानमंत्री किसान साहाय्यता योजनेचा लाभ मिळत नसल्याने अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत. एप्रिल २०पासून हा लाभ काही कारणांमुळे बंद झाला आहे. त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी शेतकरी तहसील कार्यालयात जातात तर ती साइट बंद आहे. आमच्याकडे ते काम आता राहले नाही, कृषी विभागाकडे चौकशी करा, असे सांगितले जाते. कृषी विभागात गेल्यावर ते काम आमच्याकडे अजून आलेच नाही, तसे आदेश किंवा संबधित फाइल्स व साइट्स आम्हाला मिळाल्या नाहीत, असे उत्तर मिळते. आधी बँक, तलाठी कार्यालय, सीएससी सेंटर, तहसील व कृषी विभाग अशा चकरा मारून शेतकरी त्रस्त होतात, पण लाभ काही मिळत नाही आणि समाधानकारक उत्तरही मिळत नाही. त्यामुळे चिखली तालुक्यातील प्रत्येक गावातील शेकडो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांना न्याय मिळावा व प्रधानमंत्री किसान साहाय्यता योजनेचा वार्षिक सहा हजार लाभ तसेच इतर लाभांपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नये, अशी मागणी डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन देताना उद्धवराव ढोरे, शे.बब्बू, नंदकिशोर भुसारी, संजय भुसारी, हनुमान ढोरे, शे.राजीक, शे.रसूल आदी शेतकरी उपस्थित होते.

पुरस्कार ठरला कळीचा मुद्दा !

सरकारकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट कामाबद्दलचा पुरस्कार कृषी विभागाला दिला गेला, म्हणून महसूल विभागाने या कामावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. कृषी विभागाकडूनच काम करून घ्यावे अशी भूमिका घेतली आहे, तर कृषी विभाग याकामात सुरुवातीला आम्ही पण मदत करून डाटा बनवून महसूल विभागाला दिला त्यामुळे ते काम त्यांनीच पहावे, अशी भूमिका घेत आहे. दोन शासकीय विभागाच्या या श्रेयवादाच्या लढाईत शेतकरी भरडल्या जात आहे. यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणीदेखील डॉ. भुसारी यांनी केली आहे.