शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

शेतकऱ्यांची टोलवाटोलवी त्वरित थांबवा : सत्येंद्र भुसारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST

यानुषंगाने दिलेल्या निवेदनात डॉ. भुसारी यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री किसान साहाय्यता योजनेबाबत तहसील कार्यालय व कृषी विभाग या ...

यानुषंगाने दिलेल्या निवेदनात डॉ. भुसारी यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री किसान साहाय्यता योजनेबाबत तहसील कार्यालय व कृषी विभाग या दोन शासकीय कार्यालयातील श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रधानमंत्री किसान साहाय्यता योजनेचा लाभ मिळत नसल्याने अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत. एप्रिल २०पासून हा लाभ काही कारणांमुळे बंद झाला आहे. त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी शेतकरी तहसील कार्यालयात जातात तर ती साइट बंद आहे. आमच्याकडे ते काम आता राहले नाही, कृषी विभागाकडे चौकशी करा, असे सांगितले जाते. कृषी विभागात गेल्यावर ते काम आमच्याकडे अजून आलेच नाही, तसे आदेश किंवा संबधित फाइल्स व साइट्स आम्हाला मिळाल्या नाहीत, असे उत्तर मिळते. आधी बँक, तलाठी कार्यालय, सीएससी सेंटर, तहसील व कृषी विभाग अशा चकरा मारून शेतकरी त्रस्त होतात, पण लाभ काही मिळत नाही आणि समाधानकारक उत्तरही मिळत नाही. त्यामुळे चिखली तालुक्यातील प्रत्येक गावातील शेकडो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांना न्याय मिळावा व प्रधानमंत्री किसान साहाय्यता योजनेचा वार्षिक सहा हजार लाभ तसेच इतर लाभांपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नये, अशी मागणी डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन देताना उद्धवराव ढोरे, शे.बब्बू, नंदकिशोर भुसारी, संजय भुसारी, हनुमान ढोरे, शे.राजीक, शे.रसूल आदी शेतकरी उपस्थित होते.

पुरस्कार ठरला कळीचा मुद्दा !

सरकारकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट कामाबद्दलचा पुरस्कार कृषी विभागाला दिला गेला, म्हणून महसूल विभागाने या कामावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. कृषी विभागाकडूनच काम करून घ्यावे अशी भूमिका घेतली आहे, तर कृषी विभाग याकामात सुरुवातीला आम्ही पण मदत करून डाटा बनवून महसूल विभागाला दिला त्यामुळे ते काम त्यांनीच पहावे, अशी भूमिका घेत आहे. दोन शासकीय विभागाच्या या श्रेयवादाच्या लढाईत शेतकरी भरडल्या जात आहे. यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणीदेखील डॉ. भुसारी यांनी केली आहे.