शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

पालिकेची मनमानी वसुली तातडीने थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:08 IST

अचानकपणे पालिकेडून भूखंड खरेदीच्या किमतीवर अर्धा टक्क्यानुसार फी आकारल्या जात असल्याने यावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी आक्षेप घेतला असून, पालिकेने ही मनमानी वसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे मालमत्ता हस्तांतरणाच्या पावतीबाबत मनसेने विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : नगरपालिका हद्दीतील मालमत्तेचे हस्तांतर करण्यासाठी यापूर्वी चिखली नगरपालिकेत १५0 रुपयांची पावती फाडावी लागत होती; मात्र यामध्ये अचानकपणे पालिकेडून भूखंड खरेदीच्या किमतीवर अर्धा टक्क्यानुसार फी आकारल्या जात असल्याने यावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी आक्षेप घेतला असून, पालिकेने ही मनमानी वसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे केली आहे.चिखली नगरपालिकेत यापूर्वी मालमत्ता हस्तांतरण करावयाचे असल्यास नाममात्न १५0 रुपयांची पावती फाडावी लागत होती; मात्न आता नगरपालिका प्रशासनाकडून भूखंडाच्या खरेदी किमतीवर अर्धा टक्का वसुली सुरू असल्याचा आरोप बरबडे यांनी केला असून, यानुसार एखादा भूखंड पाच लाख रुपयांत खरेदी केल्यास ती मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी भूखंड हस्तांतरण फी म्हणून अडीच हजार रुपयांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे. ही बाब काही जागरूक नागरिकांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या लक्षात आणून दिली असताना बरबडे यांनी याबाबत नगरपालिकेत केलेल्या चौकशीमध्ये नगरपालिकेच्या सभागृहाने पारित केलेल्या ठरावानुसार ही वसुली सुरू असल्याचे समजले. प्रत्यक्षात शासनाच्या कोणत्या निर्णयानुसार ही वसुली सुरू आहे, याबाबतही खुलासा झालेला नाही तर नगरपालिकेचे कर्मचारी ज्या ठरावाचा दाखला देत आहे, तो ठराव नगरपालिकेने २२ फेब्रुवारी २00७ रोजी पारित केलेला असून, त्याची अंमलबजावणी २0१७ पासून चालविली आहे. त्यामुळे त्या  ठरावावरच शंका उपस्थित करून ठरावानंतर नगरपालिका गेली दहा वर्षे झोपली होती का,   आताच या ठरावाची अंमलबजावणी का सुरू आहे, असा सवाल बरबडे यांनी उपस्थित केला असून, ही बाब गंभीर स्वरूपाची असून, जनसामान्यांच्या खिशातून पैसे उपसण्याचे काम नगरपालिका करीत  असल्याचा आरोप करीत मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे ही फी वाढ रद्द करण्याची मागणी केली असून, कोणत्याही मूलभूत सुविधा व्यवस्थित न पुरविणार्‍या नगरपालिकेला कुठलीच करवाढ करायचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे मालमत्ता हस्तानंतरणात केलेली करवाढ रद्द व्हायला हवी, कारण भूखंडधारक खरेदीच्या वेळेसच जी नोंदणी फी व मुद्रांक शुल्क भरल्या जाते, त्यामध्ये एक टक्का अधिभार हा नगरपालिकेसाठीच असतो. त्यामुळे पुन्हा नवीन अधिभार घेण्याचा नगरपालिकेस कुठलाही अधिकार नसल्याचे बरबडे यांनी स्पष्ट केले असून, पालिकेमध्ये जोपर्यंत नगरपालिका लेखी शासन निर्णय दाखवत नाही, तोपर्यंत नागरिकांनीदेखील अर्धा टक्का मालमत्ता हस्तांतरणाची रक्कम भरू नये, असे आवाहन बरबडे यांनी केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेश परिहार, गजानन सोळंकी, प्रदीप भवर, प्रवीण महाडिक, रवी पेटकर, अजय खरपास आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका