शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुतळे, स्मारके असुरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:13 IST

चिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण  झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त तसेच संपूर्णपणे ‘ब्रान्झ’ धातूने  बनविलेल्या स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या  अश्‍वारूढ पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर या घटनेचा समाजातील  सर्व स्तरातून निषेध होत असून, या घटनेने शहरातील स्मारके व पु तळय़ांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देचिखली येथील पुतळा विटंबनेच्या घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरपुतळय़ांना तातडीने सुरक्षा व्यवस्था पुरवावी - मागणी

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण  झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त तसेच संपूर्णपणे ‘ब्रान्झ’ धातूने  बनविलेल्या स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या  अश्‍वारूढ पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर या घटनेचा समाजातील  सर्व स्तरातून निषेध होत असून, या घटनेने शहरातील स्मारके व पु तळय़ांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तथापि, शहरात  कायदा व सुव्यस्था अबाधित राहून शांतता भंग होऊ नये, यासाठी पु तळय़ांना तातडीने सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी यानिमित्ताने  समोर आली आहे.युगपुरुष, हुतात्मे, राष्ट्रपुरुष महान व्यक्तिमत्त्व यांचा आदर्श लोकांनी  घ्यावा, त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, त्यांचा इतिहास हा नवीन  िपढीला माहीत व्हावा, हा सर्वसाधारण उद्देश महापुरुषांच्या पुतळा व  स्मारके उभारणीमागे असतो. त्यामुळे प्रत्येक शहरात, गावागावांत  युगपुरुष, हुतात्मे व सन्माननीय व्यक्तींचे पुतळे उभारण्यात आले आहे त; मात्र पुतळय़ांच्या उभारणीनंतर महापुरुषांना जातीच्या, विचारांच्या  आधारे वाटण्याची चढाओढ समाजात सुरू असल्यानेच पुतळय़ांच्या  विटंबनेच्या घटनांवरून दंगलीचे प्रकार घडत असतात. सुदैवाने चि खलीत घडलेला प्रकार हा त्यातला नव्हता आणि शांतताप्रिय व  सामाजिक सलोख्याच्या बाबतीत कायम संवेदनशील असलेल्या  चिखली शहरात हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ाच्या विटंबने पश्‍चात विशेषत: राजपूत बांधवांनी आपला संयम ढळू न दिल्याने  शहराची शांतता अबाधित राहिली असली, तरी या घटनेने शहरातील  सर्वच महापुरुषांचे पुतळे व स्मारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर  आला. पालिकेच्या सर्वेक्षणानुसार चिखली शहरात आज रोजी महा पुरुषांचे एकूण १६ पुतळे आहेत. यामध्ये महात्मा गांधी, लोकमान्य  टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, त थागत गौतम बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, हिंदूसूर्य महाराणा प्रता प, वासुदेव बळवंत फडके यांचे प्रत्येकी एक तर डॉ. बाबासाहेब  आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांची प्रत्येकी दोन असे एकूण १२  पुतळे अस्तित्वात आहेत. शहरातील हे सर्व पुतळे नगरपालिकेच्या  अखत्यारीत आहेत. ज्या महापुरुषांच्या त्यागाने भारत वर्षाचा इतिहास  झळाळला, त्यांच्या पुतळ्यांच्या स्वच्छतेबरोबरच सुरक्षिततेचा प्रश्नही  आजघडीला निर्माण झाला असून, पुतळ्यांभोवती असलेले घाणीचे  साम्राज्य, अस्वच्छता, पुतळ्यांसाठी असलेल्या संरक्षक कठड्याला  लावण्यात येणारे बॅनर अशा अनेक कारणांनी काही पुतळे बंदिस्त  असून, शहरातील सर्वच पुतळ्यांची अवस्था सारखीच आहे. पु तळ्यांना कुठेही संरक्षण नाही, अनेक पुतळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी  पायर्‍या नाहीत. अनेक महापुरुषांच्या पुतळा परिसराची अत्यंत  दयनीय अवस्था असून, पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे,  नियमित साफसफाई करणे, पुतळ्यासह चबुतर्‍याची योग्य निगा रा खणे आवश्यक आहे. उभारलेल्या पुतळ्यांवरून राजकीय व आ िर्थक फायदा उठविण्याचा धंदा सध्या तेजीत असताना पालिका  प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करताना दिसून येते. पु तळ्यांना कुठेही सरंक्षण न दिल्या गेल्याने त्यांच्या विटंबनेच्या अप्रिय  घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. महाराणा प्रताप पुतळा विटंबनाची  घटनाही केवळ सुरक्षिततेच्या अभावाने घडली आहे. ही घटना एका  मद्यपीकडून नशेत घडली असल्याचे निष्पन्न झाले आहे. वस्तुत: ही  बाब निष्पन्न होण्यापूर्वी जनक्षोभ उसळला असता, तर त्यास आवर  घालणे कठीण झाले असते; मात्र सर्वच महाराणाप्रेमी जनतेने मोठा  संयम बाळगला. पोलिसांना तपासासाठी वेळ देऊन शहराची शांतता  अबाधित राखण्यात मोलाची मदत झाली आहे. यापासून बोध घेत  पालिकेने तातडीने सर्व पुतळे व स्मारकांना सुरक्षा व्यवस्था पुरविणे  गरजेचे झाले आहे. 

सणवार, जयंती-पुण्यतिथी तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न  उद्भवल्यास पुतळ्यांना आम्ही संरक्षण देत असतो; मात्र इतर वेळी पु तळ्यांना संरक्षण देणे, ही जबाबदारी पुतळा स्थापनार्‍या समितीने  पालिकेला हस्तांतरित केली असल्यास ती जबाबदारी नगर परिषदेची  असते. सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये व शांतता अबाधित राहावी,  यासाठी पालिकेने आपली जबाबदारी ओळखून पुतळ्यांना योग्य ते  संरक्षण पुरवावे.-महेंद्र देशमुख, ठाणेदार, चिखली.