शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

राज्य सरकारचा नाबार्डसोबत सामंजस्य करार

By admin | Updated: March 18, 2015 01:40 IST

बुलडाणा जिल्हा बँक पुनरूज्जीवनाची प्रक्रिया; मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट.

बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला मदत देण्याबाबत केंद्र सरकारने ५ नोव्हेंबर रोजी केलेली घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी राज्य सरकारचा केंद्र सरकार तसेच नाबार्डसोबत करारनामा होणे अपेक्षित आहे. हा करारनामा २0 फेब्रुवारी रोजी होणार होता; मात्र विविध कारणांमुळे तो लांबला होता. अखेर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिव्टरवर या सामंजस्य कराराबाबत स्वत: माहिती दिली असल्याने जिल्हा बँकेच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग खुला झाला आहे. अडचणीत आलेल्या बुलडाणा, वर्धा, नागपूर जिल्हा बँकांना मदत करण्याची घोषणा ५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी एमओयू म्हणजे (मेमॅरेन्डम ऑप अंडरस्डींग) अर्थात करारनामा होणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेच्या पुनरूज्जीवनासाठी केंद्र सरकारसोबतच नाबार्डची भूमिका मोठी असल्याने या राज्य सरकारकडून या करारनामासंदर्भात मंगळवारी हालचाली झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, आ. डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत नाबार्डसोबत करारनामा झाल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी टिव्टरवर दिली आहे. त्यांनी याबाबत नमूद केले आहे की, नागपूर, वर्धा व बुलडाणा या तिन्ही जिल्हा बँकेच्या संदर्भा तील सामंजस्य करार झाला असून, दोन लाख ५0 हजार शेतकर्‍यांना कर्ज मिळण्यास या करारामुळे मदत होणार आहे. दरम्यान, पीएम घोषणेच्या अंमलबजावणीसाठीसुद्धा हा करार महत्त्वाचा ठरणार आहे; तसेच या करारामुळे जिल्हा बँकेच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेविरोधात नागपूर न्यायालयाच्या खंडपीठात सुरू असलेल्या खटल्यातही नाबार्डला न्यायालयात आपली भूमिका सादर करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.