शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

ग्राहक मंचच्या आदेशाला स्टेट बँकेकडून केराची टोपली

By admin | Updated: May 22, 2014 23:40 IST

ग्राहक मंचाकडून बँकेच्या व्यवस्थापकाविरुध्द निकाल देऊन दोन महिन्याचा कालावधी होऊनही तक्रारकर्त्याचे खात्यात सदर धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली नाही.

संग्रामपूर : खात्यामध्ये धनादेश जमा झाला असतांना रक्कम जमा दिसत नसल्याची तक्रार करुनही येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने दखल घेतली नाही. याबाबत ग्राहक मंचाकडून बँकेच्या व्यवस्थापकाविरुध्द निकाल देऊन दोन महिन्याचा कालावधी होऊनही तक्रारकर्त्याचे खात्यात सदर धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहक मंचाचे आदेशाला बँकेने केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. वरवट बकाल येथील प्रा. सुभाष गुर्जर हे सप्टेंबर २0१२ मध्ये अमृतसर युनिर्व्हसीटी मध्ये रिप्रेशर कोर्स ट्रेनिंगसाठी २४ दिवसांकरिता गेले होते. तेथे राहण्याचा, खाण्याचा खर्चाच्या मोबदल्यात त्यांना ८00४ (आठ हजार चार) रुपये रकमेचा धनादेश क्र. 0४७५४९ देण्यात आला होता. हा धनादेश प्रा.सुभाष गुर्जर यांनी संग्रामपूर स्टेट बँक शाखेत जमा करणेसाठी दिला होता. तशी त्यांच्या पासबुकातही धनादेश जमा झाल्याची नोंद करण्यात आली मात्र त्या धनादेशाची रक्कम खात्यामध्ये जमा झाली नाही. त्यामुळे प्रा.सुभाष गुर्जर यांनी वेळोवेळी बँकेत जावून चौकशी केली तसेच बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनाही विचारणा केली. मात्र प्रा.सुभाष गुर्जर यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. बँकेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मुंबई, सहाय्यक महाप्रबंधक क्षेत्र बुलडाणा यांचेकडे तक्रार केल्यावरही आठ महिन्याच्या काळात सदर रक्कम खात्यात जमा झाली नाही. अखेर प्रा.गुर्जर यांनी हे प्रकरण ग्राहक मंचात सादर केले. त्यांनी सादर केलेले पुरावे व कागदपत्रे यावरुन ही तक्रार खरी असल्याचे दिसून आले. ग्राहक मंचाच्या समितीकडून सर्व पडताळणी करण्यात आल्यावर याबाबतचा आदेश काढण्यात आला. त्यामध्ये बँकेच्या व्यवस्थापकाने 0४७५४९ क्रमांकाच्या धनादेशाची रक्कम ८00४ रुपये तक्रारकर्त्याला द्यावेत किंवा खात्यात जमा करावे. या रकमेवर बँकेचे व्याज देण्यात यावे, शारिरीक, मानसिक त्रासापोटी तक्रारकर्त्याला तीन हजार रुपये द्यावे, न्यायालय खर्चापोटी तक्रारकर्त्याला दोन हजार रुपये द्यावे. या आदेशाचे पालन आदेश पारीत केल्यानंतर ४५ दिवसाचे आत करावे, असेही यामध्ये सूचित करण्यात आले होते. हा आदेश १५ फेब्रुवारी २0१४ मध्ये पारीत केला होता. मात्र या आदेशाची मुदत १ एप्रिल रोजीच संपली तरीही बँकेच्या व्यवस्थापकाकडून या आदेशाचे पालन झाले नसल्याचे समजते व अद्याप तक्रारकर्त्याचे खात्यात सदर धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली नाही, अशी माहिती प्रा.सुभाष गुर्जर यांनी दिली.