शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करा!

By admin | Updated: August 31, 2016 01:26 IST

चिखली येथे शिवसेनेची मागणी.

चिखली(जि. बुलडाणा), दि. ३0: सातत्याने तीन वर्षे दुष्काळ व अत्यल्प उत् पन्नामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. निसर्गाच्या कृपेने यंदा समाधानकारक पावसामुळे पिकांची स्थिती उत्तम असून, पिके काढणीवर आली आहेत; मात्र ऐनवेळी शेतमाल बाजारात दाखल होताना दरामध्ये घसरण झाल्यास शेतकर्‍यांची एकप्रकारे फसवणूक होण्याची शक्यता पाहता खरीप हंगामातील शे तमाल बाजारात दाखल होण्यापूर्वी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दीपक बाहेकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. चिखली तहसीलदारांमार्फत देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सातत्याने येणार्‍या दुष्काळामुळे शेतीतून उत्पादन खर्च भरून निघेल इ तके उत्पन्न झाले नाही. त्यामुळे मूग, उडीद, तुरीच्या भावात वाढ झालेली आहे. दरम्यान, डाळी वाणाची मागणी लक्षात घेता सरकारने शेतकर्‍यांना डाळवर्गीय िपकांची लागवड करण्याचे आवाहन केले होते. तर सध्या बाजारात डाळींच्या वाढलेल्या भावामुळे डाळवर्गीय पिकांना चांगला भाव मिळेल, या आशेने यंदा शे तकर्‍यांना मोठय़ा प्रमाणावर तूर, मूग, उडिदाची लागवड केली आहे. गतवर्षी मुगाचे भाव ७ ते ८ हजार रुपये प्रति क्विंटल, उडीद ८ ते १३ हजार तर तूर ९ ते ११ हजार रुपये प्रति क्विंटल होता; मात्र गतवर्षी इतके उत्पन्नच झाले नसल्याने शेतकर्‍यांना फारसा लाभ झाला नाही; मात्र सध्याची मागणी लक्षात घेता शेतकर्‍यांना यावर्षी डाळ वर्गीय पिकांतून चांगले उत्पन्न अपेक्षीत असून, पोळय़ानंतर बहुतांश शे तकर्‍यांच्या घरात उडीद, मूग येणार आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने तसेच व्या पार्‍यांनी मोठय़ा प्रमाणावर विदेशातून मूग, उडीद व तुरीच्या डाळींची आयात केल्यामुळे ऐनवेळी व्यापार्‍यांकडून या डाळवर्गीय शेतमालाचे भाव पाडून पुन्हा शे तकर्‍यांना नागविण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने याकडे ता तडीने लक्ष घालून शेतकर्‍यांच्या शेतमालाची उत्पादन खर्चाचा हिशेब करता, त्यावर ५0 टक्के नफा जोडून शेतकर्‍यांचा माल बाजारात येण्याआधी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी दीपक बाहेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देतेवेळी उपजिल्हाप्रमुख डॉ.राजपूत, शिवाजी देशमुख, मनोहर शिंदे, गजानन पवार, सिध्दूसिंग राजपूत, भगवान वाळेकर, अनिल बाहेकर, राजेंद्र चाकोतकर, सुनील बाहेकर, राजेंद्र बाहेकर आदींची उपस्थिती होती.