शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करा!

By admin | Updated: August 31, 2016 01:26 IST

चिखली येथे शिवसेनेची मागणी.

चिखली(जि. बुलडाणा), दि. ३0: सातत्याने तीन वर्षे दुष्काळ व अत्यल्प उत् पन्नामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. निसर्गाच्या कृपेने यंदा समाधानकारक पावसामुळे पिकांची स्थिती उत्तम असून, पिके काढणीवर आली आहेत; मात्र ऐनवेळी शेतमाल बाजारात दाखल होताना दरामध्ये घसरण झाल्यास शेतकर्‍यांची एकप्रकारे फसवणूक होण्याची शक्यता पाहता खरीप हंगामातील शे तमाल बाजारात दाखल होण्यापूर्वी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दीपक बाहेकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. चिखली तहसीलदारांमार्फत देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सातत्याने येणार्‍या दुष्काळामुळे शेतीतून उत्पादन खर्च भरून निघेल इ तके उत्पन्न झाले नाही. त्यामुळे मूग, उडीद, तुरीच्या भावात वाढ झालेली आहे. दरम्यान, डाळी वाणाची मागणी लक्षात घेता सरकारने शेतकर्‍यांना डाळवर्गीय िपकांची लागवड करण्याचे आवाहन केले होते. तर सध्या बाजारात डाळींच्या वाढलेल्या भावामुळे डाळवर्गीय पिकांना चांगला भाव मिळेल, या आशेने यंदा शे तकर्‍यांना मोठय़ा प्रमाणावर तूर, मूग, उडिदाची लागवड केली आहे. गतवर्षी मुगाचे भाव ७ ते ८ हजार रुपये प्रति क्विंटल, उडीद ८ ते १३ हजार तर तूर ९ ते ११ हजार रुपये प्रति क्विंटल होता; मात्र गतवर्षी इतके उत्पन्नच झाले नसल्याने शेतकर्‍यांना फारसा लाभ झाला नाही; मात्र सध्याची मागणी लक्षात घेता शेतकर्‍यांना यावर्षी डाळ वर्गीय पिकांतून चांगले उत्पन्न अपेक्षीत असून, पोळय़ानंतर बहुतांश शे तकर्‍यांच्या घरात उडीद, मूग येणार आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने तसेच व्या पार्‍यांनी मोठय़ा प्रमाणावर विदेशातून मूग, उडीद व तुरीच्या डाळींची आयात केल्यामुळे ऐनवेळी व्यापार्‍यांकडून या डाळवर्गीय शेतमालाचे भाव पाडून पुन्हा शे तकर्‍यांना नागविण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने याकडे ता तडीने लक्ष घालून शेतकर्‍यांच्या शेतमालाची उत्पादन खर्चाचा हिशेब करता, त्यावर ५0 टक्के नफा जोडून शेतकर्‍यांचा माल बाजारात येण्याआधी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी दीपक बाहेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देतेवेळी उपजिल्हाप्रमुख डॉ.राजपूत, शिवाजी देशमुख, मनोहर शिंदे, गजानन पवार, सिध्दूसिंग राजपूत, भगवान वाळेकर, अनिल बाहेकर, राजेंद्र चाकोतकर, सुनील बाहेकर, राजेंद्र बाहेकर आदींची उपस्थिती होती.