शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट, आणि रात्रीला मुक्कामही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:13 IST

सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरात येण्यासाठी आणि शहरातून आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी एसटी महामंडळाने ग्रामीण भागात ...

सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरात येण्यासाठी आणि शहरातून आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी एसटी महामंडळाने ग्रामीण भागात एसटीची बससेवा सुरू केली आहे. जिल्ह्यातील अगदी दुर्मीळ भागापर्यंत एसटी पोहोचत असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता एसटी महामंडळही पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची आता खासगी वाहनापासून सुटका होत आहे.

ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळेना

राज्य परिवहन महामंडळाची बससेवा ग्रामीण भागात बंद असल्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी मुक्कामी बससेवासुद्धा सुरू करण्यात आली आहे. सणासुदीच्या दिवसांत एसटी महामंडळ सर्वत्र बससेवा सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यात मोठी प्रवासी संख्या असल्याने बसायला जागा मिळत नसल्याचे चित्र आहे.

शहरी भागात जाणाऱ्या बसेस फुल्ल

सध्या सणासुदीचे दिवस असून, कोरोनानंतर अनेकजण प्रवास करीत आहेत. यामुळे हळूहळू गर्दी वाढली असून, शहरी भागात जाणाऱ्या एसटी बसेस या हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहेत. सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आणखी बससेवा वाढविण्यात येतील अशीही माहिती देण्यात आली आहे.

मुक्कामीचे २५ शेड्यूल्ड सुरू

ग्रामीण भागात एसटी बससेवा सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील सात आगारांतून सध्या ग्रामीण भागात मुक्कामी राहणाऱ्या एसटी बसेसचे २५ शेड्यूल्ड सुरू करण्यात आले आहेत. या बसेस ठरवून दिलेल्या गावात रात्रीला मुक्कामी राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रवाशांची वाढती संख्या पाहता आणि मागणीचा कल पाहून पुढील काही दिवसांत ग्रामीण भागात मुक्कामी राहणाऱ्या गाड्यांचे शेड्यूल्ड वाढविले जाईल. दिवाळीपर्यंत सर्वच शेड्यूल्ड पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

-संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा

कोरोनामुळे गावात मुक्कामी येणारी बस आता बंद झाली आहे. दुसऱ्या लाटेनंतर ती बस पुन्हा मुक्कामी येईल अशी आशा होती. मात्र, अद्याप तसे काही झाले नाही. गावात मुक्कामी बस सुरू करावी.

-ऋषिकेश सुसर, शिरपूर

शाळा, महाविद्यालयातील मुले आणि त्याचसोबतच काही मजूरही शहरात सकाळीच जातात. त्यांच्यासाठी सकाळीच जाणारी एसटी बस महत्त्वाची होती. मात्र, तीच बंद झाल्याने मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

-विशाल शेळके, शिरपूर.