शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

त्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST

चिखली : कोरोनामुळे निधन पावलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ देण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी परिवहन ...

चिखली : कोरोनामुळे निधन पावलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ देण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

या अनुषंगाने दिलेल्या पत्रात आमदार महाले यांनी म्हटले आहे की, राज्यभरामध्ये कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना घरीच राहावे लागले. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडाला. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. परंतु शासनाने त्यांना ऐन संकटाच्या काळात आर्थिक मदतीचा हात दिला नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील कोरोना महामारी कमी झाल्यामुळे शासनाने राज्यभरात बससेवा सुरू केल्या. कोरोना महामारीच्या काळात जिवावर उदार होऊन एस. टी. कर्मचाऱ्यांनी या काळात आपले कर्तव्य निभावले. राज्य शासनाने एस. टी. कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढलेला असतानाही अद्यापपर्यंत काेराेनाने मृत्यू झालेल्या एकाही कुटुंबाला विम्याचा लाभ मिळालेला नाही. कुटुंबीयांचा आधार गेलेला असतानाही राज्य शासनाकडून त्यांच्या हक्काच्या विम्याचा लाभही मिळालेला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या कोरोनामुळे निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा व इतर लाभ देऊन आधार द्यावा, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी या पत्राद्वारे केली आहे.

३०१ कर्मचाऱ्यांचा काेराेनाने मृत्यू

राज्यभरात ३०१ इतक्या एस.टी. कर्मचाऱ्यांचे निधन झाले. कोरोनामुळे आजपर्यंत राज्यातील आठ हजार ८९० एस.टी. कर्मचारी बाधित होऊन ८३९० कर्मचारी बरे झाले आहे. आजरोजी राज्यभरात २७०० एस.टी.कर्मचारी पॉझिटिव्ह असून ८५० कर्मचारी दवाखान्यात, तर उर्वरित गृह विलगीकरणात आहे.