शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

त्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST

चिखली : कोरोनामुळे निधन पावलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ देण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी परिवहन ...

चिखली : कोरोनामुळे निधन पावलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याचा लाभ देण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

या अनुषंगाने दिलेल्या पत्रात आमदार महाले यांनी म्हटले आहे की, राज्यभरामध्ये कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना घरीच राहावे लागले. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडाला. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. परंतु शासनाने त्यांना ऐन संकटाच्या काळात आर्थिक मदतीचा हात दिला नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील कोरोना महामारी कमी झाल्यामुळे शासनाने राज्यभरात बससेवा सुरू केल्या. कोरोना महामारीच्या काळात जिवावर उदार होऊन एस. टी. कर्मचाऱ्यांनी या काळात आपले कर्तव्य निभावले. राज्य शासनाने एस. टी. कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढलेला असतानाही अद्यापपर्यंत काेराेनाने मृत्यू झालेल्या एकाही कुटुंबाला विम्याचा लाभ मिळालेला नाही. कुटुंबीयांचा आधार गेलेला असतानाही राज्य शासनाकडून त्यांच्या हक्काच्या विम्याचा लाभही मिळालेला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या कोरोनामुळे निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा व इतर लाभ देऊन आधार द्यावा, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी या पत्राद्वारे केली आहे.

३०१ कर्मचाऱ्यांचा काेराेनाने मृत्यू

राज्यभरात ३०१ इतक्या एस.टी. कर्मचाऱ्यांचे निधन झाले. कोरोनामुळे आजपर्यंत राज्यातील आठ हजार ८९० एस.टी. कर्मचारी बाधित होऊन ८३९० कर्मचारी बरे झाले आहे. आजरोजी राज्यभरात २७०० एस.टी.कर्मचारी पॉझिटिव्ह असून ८५० कर्मचारी दवाखान्यात, तर उर्वरित गृह विलगीकरणात आहे.