शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सोयाबीनच्या उत्पन्नात मजुरीही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:12 IST

संग्रामपूर: शेतकर्‍यांसाठी नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक  ओळखले जाते; मात्र यावर्षी सोयाबीन पिकाला पावसाचे वेळेवर  पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनला शेंगाच न लागल्यामुळे शे तकर्‍यांनी चक्क सोयाबीन पिकावर पिकाची सोंगणी केली. त्या  शेतकर्‍यांना प्रति एकरात फक्त १ क्विंटलच सोयाबीनचे उत्पादन  झाले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन पिकासाठी खर्च ५ हजार एका एकरातून उत्पादन १  हजार ५00 रूपये 

अमोल ठाकरे। लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: शेतकर्‍यांसाठी नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक  ओळखले जाते; मात्र यावर्षी सोयाबीन पिकाला पावसाचे वेळेवर  पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनला शेंगाच न लागल्यामुळे शे तकर्‍यांनी चक्क सोयाबीन पिकावर पिकाची सोंगणी केली. त्या  शेतकर्‍यांना प्रति एकरात फक्त १ क्विंटलच सोयाबीनचे उत्पादन  झाले आहे. तसेच या सोयाबीन पिकाला बाजारात कवडीमोल  भाव मिळत असल्यामुळे या सोयाबीन उत्पादनातून काढणीचा  खर्चही निघत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न भंगले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी चांगला पाऊस होईल,  असे समजले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या तुलनेत  यावर्षी संग्रामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाची  पेरणी मोठय़ा प्रमाणात केली होती. सन २0१७-१८ च्या खरीप  हंगामात शेतकर्‍यांनी १४ हजार ८५९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची  पेरणी केली. सुरुवातीला पावसाने ही साथ दिली; मात्र ऐन  दिवाळीच्या आधी ज्यावेळी सोयाबीन पिकाला पावसाची  आवश्यकता असते, ऐन त्याचवेळी ऑक्टोबर महिन्यात पावसाने  दांडी मारल्यामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला वेळेवर  पाऊस न बरसल्यामुळे ज्या प्रमाणात सोयाबीनला शेंगा लागायला  पाहिजे  होत्या. त्या प्रमाणात शेंगा लागल्या नाहीत, त्यामुळे शेतात  सोयाबीन होते; मात्र सोयाबीनच्या झाडाला शेंगाच नसल्यामुळे  काही ठिकाणी शेतकर्‍यांनी चक्क सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर  फिरवला; मात्र ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनची काढणी केली, त्या  शेतकर्‍यांना फक्त एकरी सोयाबीनच्या पिकातून १ क्विंटल प्रति िक्वंटल उत्पादन झाले व या सोयाबीनला बाजारात फक्त १ हजार  ५00 ते २ हजार २00 रुपयापर्यंतच भाव मिळाले. एका एकरात सोयाबीन उत्पन्न १ हजार ५00 रुपये तर पेरणी पासून बियाणे, रासायनिक खत, फवारणी, डवरणी व काढणी  याचा खर्च ५ हजार रुपये त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनातून  काढणी खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वा तावरण निर्माण झाले आहे. वर्षभराचा खर्च मुलाचे शिक्षण,  दवाखाने, लग्न व घराचा कारभार कसा सांभाळावा, असा यक्ष प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने सोयाबीन  उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालु क्यातील शेतकर्‍यांकडून जोर धरत आहे. 

पिकासाठी लागवडीपासून काढणीपर्यंत लागणारा खर्चसोयाबीन बियाणे         १ बॅग प्रति एकर - १,५00 रुपयेरासायनिक खत - १000 रुपयेतणनाशक    - ८00 रुपयेफवारणी - ८00रुपयेडवरणी - ५00  रुपये काढणी खर्च - १,000 रु.एकूण खर्च - ५,१00 रुपये

एकरी सोयाबीन पिकातून एक क्विंटल उत्पादनही होत  नसल्यामुळे व काढणीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकर्‍यांना  सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागत आहे.- राजेंद्र ठाकरे, शेतकरी, वडगाव वाण

टॅग्स :agricultureशेती