शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:20 IST

वन्य प्राण्यांचा हैदोस, दुबार पेरणीचे संकट : २० टक्के बियाणांचीच उगवण

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/बोरखेड : जिल्ह्यात पावसाने दिलेली दडी, बोगस बियाण्यांचा भडीमार त्यातच वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. घाटावरील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून, पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड शिवारात शेत असलेल्या शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण सात एकरावर ट्रॅक्टर फिरविला आहे. परिसरात पाऊस लांबत असल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सोनाळा, सायखेड, पिंगळी, वारखेड, सगोडा, पळसोडा, दानापूर या गावात गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्यामुळे अखेर जास्तीत जास्त दुबार तिबार पेरणी करण्याचे संकट कोरडवाहू शेतकऱ्यांवर येऊन ठेपले आहे; तसेच काही शेतकऱ्यांची प्रथम पेरणी करण्याचेसुद्धा बाकी आहे. पुढील घर खर्च व मुलांचे शिक्षण, लग्न, कसे काय भागवावे, अशा विविध संकटात कोरडवाहू शेतकरी अडकला असतानाच, बोरखेड गावालगत गट ५३ मध्ये गोपाल व्यास या शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. या शेतकऱ्याने २० जून रोजी शेतात सोयाबीनची पेरणी केली; मात्र पावसाने लांब दडी मारल्याने त्यातील बरेच बियाणे जमिनीच्या आत खराब झाले. दरम्यान, पाऊस आल्यानंतर सोयाबीन निघेल, या आशेने ते थांबले. अखेर १२ जुलै रोजी मध्यरात्रीपासून पावसाचे थोडे आगमन झाले. परिणामी, शेतात जास्तीत जास्त सोयाबीन निघेल, अशी आशा त्यांना होती; मात्र १८ जुलै रोजी शेतात फेरफटका मारला असता, शेतात फक्त २० टक्के सोयाबीन पीक उगवले, ताबडतोब त्यांनी दुसरे पीक घेण्याकरिता सात एकरातील सोयाबीनवर त्यांनी ट्रॅक्टर फिरवला. वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केले सोयाबीन धाड : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण असताना वन्य प्राण्यांकडून शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. धाडनजीक ग्राम बोरखेड बुलडाणा शिवारात शेतकऱ्यांचे तब्बल पाच एकरावरील सोयाबीन वन्य प्राण्यांनी नासधुस करीत उद्ध्वस्त केले आहे. या घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे साधारण एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच निसर्गाचा लहरीपणा, सतत पडणारा दुष्काळ, या प्रकाराने शेतकरी हैराण असताना बोरखेड धाड या गावातील अंकुश साहेबराव वाघ यांचे गट नं.११५ मधील साधारण ५ एकरावरचे सोयाबीन पीक हे रानरोही, हरीण या वन्य प्राण्यांनी १५ जुलै रोजी नासधूस करीत उद्ध्वस्त केले. यावर्षी पुरेसा समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांची प्रतवारी चांगली आहे. गेल्या चार पाच दिवसात अंकुश वाघ यांचे शेतात हरणांचा कळप व रानरोही यासारख्या वन्य प्राण्यांची सरसकट पाच एकरावरचे सोयाबीन उद्ध्वस्त केल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही वर्षात या भागात कृषी क्षेत्रावर वन्य प्राण्यांच्या वावरामुळे पिकांचे नुकसान होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. वन्य प्राण्यांमुळे शेतकरी वर्गास हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने उपाय योजना करुन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांस आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.