शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:20 IST

वन्य प्राण्यांचा हैदोस, दुबार पेरणीचे संकट : २० टक्के बियाणांचीच उगवण

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/बोरखेड : जिल्ह्यात पावसाने दिलेली दडी, बोगस बियाण्यांचा भडीमार त्यातच वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. घाटावरील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून, पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड शिवारात शेत असलेल्या शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण सात एकरावर ट्रॅक्टर फिरविला आहे. परिसरात पाऊस लांबत असल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सोनाळा, सायखेड, पिंगळी, वारखेड, सगोडा, पळसोडा, दानापूर या गावात गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्यामुळे अखेर जास्तीत जास्त दुबार तिबार पेरणी करण्याचे संकट कोरडवाहू शेतकऱ्यांवर येऊन ठेपले आहे; तसेच काही शेतकऱ्यांची प्रथम पेरणी करण्याचेसुद्धा बाकी आहे. पुढील घर खर्च व मुलांचे शिक्षण, लग्न, कसे काय भागवावे, अशा विविध संकटात कोरडवाहू शेतकरी अडकला असतानाच, बोरखेड गावालगत गट ५३ मध्ये गोपाल व्यास या शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. या शेतकऱ्याने २० जून रोजी शेतात सोयाबीनची पेरणी केली; मात्र पावसाने लांब दडी मारल्याने त्यातील बरेच बियाणे जमिनीच्या आत खराब झाले. दरम्यान, पाऊस आल्यानंतर सोयाबीन निघेल, या आशेने ते थांबले. अखेर १२ जुलै रोजी मध्यरात्रीपासून पावसाचे थोडे आगमन झाले. परिणामी, शेतात जास्तीत जास्त सोयाबीन निघेल, अशी आशा त्यांना होती; मात्र १८ जुलै रोजी शेतात फेरफटका मारला असता, शेतात फक्त २० टक्के सोयाबीन पीक उगवले, ताबडतोब त्यांनी दुसरे पीक घेण्याकरिता सात एकरातील सोयाबीनवर त्यांनी ट्रॅक्टर फिरवला. वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केले सोयाबीन धाड : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण असताना वन्य प्राण्यांकडून शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. धाडनजीक ग्राम बोरखेड बुलडाणा शिवारात शेतकऱ्यांचे तब्बल पाच एकरावरील सोयाबीन वन्य प्राण्यांनी नासधुस करीत उद्ध्वस्त केले आहे. या घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे साधारण एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच निसर्गाचा लहरीपणा, सतत पडणारा दुष्काळ, या प्रकाराने शेतकरी हैराण असताना बोरखेड धाड या गावातील अंकुश साहेबराव वाघ यांचे गट नं.११५ मधील साधारण ५ एकरावरचे सोयाबीन पीक हे रानरोही, हरीण या वन्य प्राण्यांनी १५ जुलै रोजी नासधूस करीत उद्ध्वस्त केले. यावर्षी पुरेसा समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांची प्रतवारी चांगली आहे. गेल्या चार पाच दिवसात अंकुश वाघ यांचे शेतात हरणांचा कळप व रानरोही यासारख्या वन्य प्राण्यांची सरसकट पाच एकरावरचे सोयाबीन उद्ध्वस्त केल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही वर्षात या भागात कृषी क्षेत्रावर वन्य प्राण्यांच्या वावरामुळे पिकांचे नुकसान होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. वन्य प्राण्यांमुळे शेतकरी वर्गास हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने उपाय योजना करुन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांस आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.