शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:20 IST

वन्य प्राण्यांचा हैदोस, दुबार पेरणीचे संकट : २० टक्के बियाणांचीच उगवण

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/बोरखेड : जिल्ह्यात पावसाने दिलेली दडी, बोगस बियाण्यांचा भडीमार त्यातच वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. घाटावरील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून, पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड शिवारात शेत असलेल्या शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण सात एकरावर ट्रॅक्टर फिरविला आहे. परिसरात पाऊस लांबत असल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सोनाळा, सायखेड, पिंगळी, वारखेड, सगोडा, पळसोडा, दानापूर या गावात गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्यामुळे अखेर जास्तीत जास्त दुबार तिबार पेरणी करण्याचे संकट कोरडवाहू शेतकऱ्यांवर येऊन ठेपले आहे; तसेच काही शेतकऱ्यांची प्रथम पेरणी करण्याचेसुद्धा बाकी आहे. पुढील घर खर्च व मुलांचे शिक्षण, लग्न, कसे काय भागवावे, अशा विविध संकटात कोरडवाहू शेतकरी अडकला असतानाच, बोरखेड गावालगत गट ५३ मध्ये गोपाल व्यास या शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. या शेतकऱ्याने २० जून रोजी शेतात सोयाबीनची पेरणी केली; मात्र पावसाने लांब दडी मारल्याने त्यातील बरेच बियाणे जमिनीच्या आत खराब झाले. दरम्यान, पाऊस आल्यानंतर सोयाबीन निघेल, या आशेने ते थांबले. अखेर १२ जुलै रोजी मध्यरात्रीपासून पावसाचे थोडे आगमन झाले. परिणामी, शेतात जास्तीत जास्त सोयाबीन निघेल, अशी आशा त्यांना होती; मात्र १८ जुलै रोजी शेतात फेरफटका मारला असता, शेतात फक्त २० टक्के सोयाबीन पीक उगवले, ताबडतोब त्यांनी दुसरे पीक घेण्याकरिता सात एकरातील सोयाबीनवर त्यांनी ट्रॅक्टर फिरवला. वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केले सोयाबीन धाड : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण असताना वन्य प्राण्यांकडून शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. धाडनजीक ग्राम बोरखेड बुलडाणा शिवारात शेतकऱ्यांचे तब्बल पाच एकरावरील सोयाबीन वन्य प्राण्यांनी नासधुस करीत उद्ध्वस्त केले आहे. या घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे साधारण एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच निसर्गाचा लहरीपणा, सतत पडणारा दुष्काळ, या प्रकाराने शेतकरी हैराण असताना बोरखेड धाड या गावातील अंकुश साहेबराव वाघ यांचे गट नं.११५ मधील साधारण ५ एकरावरचे सोयाबीन पीक हे रानरोही, हरीण या वन्य प्राण्यांनी १५ जुलै रोजी नासधूस करीत उद्ध्वस्त केले. यावर्षी पुरेसा समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांची प्रतवारी चांगली आहे. गेल्या चार पाच दिवसात अंकुश वाघ यांचे शेतात हरणांचा कळप व रानरोही यासारख्या वन्य प्राण्यांची सरसकट पाच एकरावरचे सोयाबीन उद्ध्वस्त केल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही वर्षात या भागात कृषी क्षेत्रावर वन्य प्राण्यांच्या वावरामुळे पिकांचे नुकसान होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. वन्य प्राण्यांमुळे शेतकरी वर्गास हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने उपाय योजना करुन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांस आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.