शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

सोयाबीनवर हिलीओथीस अळीचे आक्रमण!

By admin | Updated: August 10, 2015 00:54 IST

बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव, सल्ला घेऊच शेतक-यांनी उपाय करण्याचे अवाहन.

बुलडाणा : दोन दिवस झालेल्या संततधार पावसानंतर आता सोयाबीनवर हिलीओथीस अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही उंट अळी, लष्करी अळी असल्याची चर्चा शेतकर्‍यामध्ये सुरू आहे; मात्र शेतकर्‍यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. माहिती व मार्गदर्शन न घेता केलेल्या उपायांमुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. यावर्षी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर सोयाबीनचा पेरा आहे; मात्र पेरणी झाल्यानंतर तब्बल दीड महिना पावसाने उघाड दिल्याने अनेक ठिकाणच्या पेरण्या उलटल्या. त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील सोमवार, मंगळवार असे दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे उरलेल्या पिकांना जीवदान मिळाले. पावसाअभावी कशीबशी तग धरून असलेली सोयाबीनची झपाट्याने वाढ होत आहे; मात्र आता पुन्हा सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. सोयाबीनवर काही ठिकाणी हिलीओथीस अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बुलडाणा आणि मेहकर तालुक्यात अळीचा मारा अधिक असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ही अळी मारण्यासाठी शेतकर्‍यांनी फवारणी सुरू केली आहे. मात्र नेमकी अळी कोणती आहे, त्यासाठी फवारणी करताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. त्यासाठी कृषितज्ज्ञांचे शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरज आहे. यासंदर्भात कृषी विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क केला असता, सोयाबीनवर नेमकी कोणती अळी पडली, याची माहिती घेणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. हा उंट अळीचा प्रादुर्भाव नाही, असेही सांगण्यात आले आहे.