शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोयाबीनवर हिलीओथीस अळीचे आक्रमण!

By admin | Updated: August 10, 2015 00:54 IST

बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव, सल्ला घेऊच शेतक-यांनी उपाय करण्याचे अवाहन.

बुलडाणा : दोन दिवस झालेल्या संततधार पावसानंतर आता सोयाबीनवर हिलीओथीस अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही उंट अळी, लष्करी अळी असल्याची चर्चा शेतकर्‍यामध्ये सुरू आहे; मात्र शेतकर्‍यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. माहिती व मार्गदर्शन न घेता केलेल्या उपायांमुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. यावर्षी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर सोयाबीनचा पेरा आहे; मात्र पेरणी झाल्यानंतर तब्बल दीड महिना पावसाने उघाड दिल्याने अनेक ठिकाणच्या पेरण्या उलटल्या. त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील सोमवार, मंगळवार असे दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे उरलेल्या पिकांना जीवदान मिळाले. पावसाअभावी कशीबशी तग धरून असलेली सोयाबीनची झपाट्याने वाढ होत आहे; मात्र आता पुन्हा सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. सोयाबीनवर काही ठिकाणी हिलीओथीस अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बुलडाणा आणि मेहकर तालुक्यात अळीचा मारा अधिक असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ही अळी मारण्यासाठी शेतकर्‍यांनी फवारणी सुरू केली आहे. मात्र नेमकी अळी कोणती आहे, त्यासाठी फवारणी करताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. त्यासाठी कृषितज्ज्ञांचे शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरज आहे. यासंदर्भात कृषी विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क केला असता, सोयाबीनवर नेमकी कोणती अळी पडली, याची माहिती घेणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. हा उंट अळीचा प्रादुर्भाव नाही, असेही सांगण्यात आले आहे.