शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

पुरेशी ओल असल्यावरच पेरणी करावी- राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:34 IST

हिवरा आश्रमः खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणांची उगवणक्षमता तपासून घ्यावी.पुरेशी ओल असल्यावरच पेरणी करावी.पेरणी करताना रुंद सरी ...

हिवरा आश्रमः खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणांची उगवणक्षमता तपासून घ्यावी.पुरेशी ओल असल्यावरच पेरणी करावी.पेरणी करताना रुंद सरी वरंबा व इतर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी केले.

खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी बी.बी.एफ. (रुंद सरी वरंबा) व पट्टा पद्धतीने करण्याबाबत ट्रॅक्टर चालक व मालक यांचे प्रशिक्षण गजरखेड येथे गुरुवारी पार पडले. या पद्धतीने पेरणी केल्यानंतर होणाऱ्या फायद्याबाबत वसंत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बीबीएफ यंत्राबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित चालकांना पेरणी करताना काय काळजी घ्यावी, बियाणे किती खोलीवर पडणे आवश्यक आहे, ट्रॅक्टरचा वेग किती असावा इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्याने बियाणांची बचत होते.जास्त पाऊस झाल्यास जास्तीचे पाणी सरीद्वारे वाहून जाते.कमी पाऊस झाल्यास पाणी सरीमध्ये मुरुन पावसाच्या खंड कालावधीत पिके तग धरू शकतात. सरी पडत असल्याने शेतभर हवा खेळती राहते़ त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनामध्ये वाढ होते. सरीद्वारे फवारणी करणे सोयीचे होते. इत्यादी फायदे बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्याने होत असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी राठोड यांनी सांगितले. या प्रशिक्षणाकरिता तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, मंडळ कृषी अधिकारी सुधाकर कंकाळ, पिंपळगाव उंडाचे कृषी सहायक किशोर इंगळे, ट्रॅक्टर मालक विठ्ठल वडुळे, चालक शिवशंकर लाकडे , बुद्धेश्वर सरकटे, अशोक लाकडे, अमोल लाकडे, प्रदीप लाकडे, परसराम गिर्हे, बबन लाकडे, रामेश्वर लाकडे इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.