शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 15:30 IST

संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

- अजहर अली लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.गत दहा ते बारा दिवसापासून वरून राजा रुसून बसल्याने हजारो हेक्टरवरील पेरण्या करपण्याची दाट शक्यता आहे. सद्यास्थिती पेरणी झालेली पिके उगवली असुन तापमाणात वाढ झाल्याने सोपटत आहेत. पिकांना पाणि न मिळाल्यास उगवलेली पिके करपतील या मुळे येथिल शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गंभिर स्वरूपाच्या दुष्काळाने आर्थिक संकटात सापडलेल्या दुष्काळ ग्रस्त शेतकय्रांसाठी पावसाने दडी मारल्याने दुष्काळात तेरावा महीना उगवला. संग्रामपूर तालुक्यातील ४४ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावर दर वर्षी खरीप पिकींची लागवड करण्यात येते.सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले दुथळी भरून वाहु लागले. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यावर्षी पावसाळा चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले होते.शेतकºयांनी शेतीत विविध पिकांची लागवड केली. तालुक्यात एकुण ३६ हजार ४६० हेक्टरवरील क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये ३११ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली. मका ८८२ हेक्टर, तुर १ हजार ६५९ हेक्टर, मुग ६८३ हेक्टर, उडीद ५५९ हेक्टर, सोयाबिन ११ हजार ७३०, तर कपाशी पिकाची २० हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असुन सर्व पिके पाण्याअभावी धोक्यात आली असल्याचे विदारक चित्र आहे. गत पाच वर्षापासून संग्रामपुर तालुक्यात निर्सगाच्या लहरीपणामुळे शेती पिकांचे मोठ्यीप्रमाणात नुकसान होत असल्याने शेती घाट्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थीक कोंडी झालेली दिसून येते. खरिप हंगामात बँकांनी पिक कर्ज व कर्जाचे पुर्नगठन करण्यास नकार घंटा दिल्याने शेतकºयांनी सावकारांचे उंबरठे झिजवत कर्ज काढुन हंगामी पिकांची पेरणी केली.परंतु पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात पावसाचे लवकर आगमन न झाल्यास हजारो हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकºयांवर येणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे बळीराजा व्यथीत झाला आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरagricultureशेतीFarmerशेतकरी