शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

संग्रामपूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 15:30 IST

संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

- अजहर अली लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.गत दहा ते बारा दिवसापासून वरून राजा रुसून बसल्याने हजारो हेक्टरवरील पेरण्या करपण्याची दाट शक्यता आहे. सद्यास्थिती पेरणी झालेली पिके उगवली असुन तापमाणात वाढ झाल्याने सोपटत आहेत. पिकांना पाणि न मिळाल्यास उगवलेली पिके करपतील या मुळे येथिल शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गंभिर स्वरूपाच्या दुष्काळाने आर्थिक संकटात सापडलेल्या दुष्काळ ग्रस्त शेतकय्रांसाठी पावसाने दडी मारल्याने दुष्काळात तेरावा महीना उगवला. संग्रामपूर तालुक्यातील ४४ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावर दर वर्षी खरीप पिकींची लागवड करण्यात येते.सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले दुथळी भरून वाहु लागले. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यावर्षी पावसाळा चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले होते.शेतकºयांनी शेतीत विविध पिकांची लागवड केली. तालुक्यात एकुण ३६ हजार ४६० हेक्टरवरील क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये ३११ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली. मका ८८२ हेक्टर, तुर १ हजार ६५९ हेक्टर, मुग ६८३ हेक्टर, उडीद ५५९ हेक्टर, सोयाबिन ११ हजार ७३०, तर कपाशी पिकाची २० हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असुन सर्व पिके पाण्याअभावी धोक्यात आली असल्याचे विदारक चित्र आहे. गत पाच वर्षापासून संग्रामपुर तालुक्यात निर्सगाच्या लहरीपणामुळे शेती पिकांचे मोठ्यीप्रमाणात नुकसान होत असल्याने शेती घाट्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थीक कोंडी झालेली दिसून येते. खरिप हंगामात बँकांनी पिक कर्ज व कर्जाचे पुर्नगठन करण्यास नकार घंटा दिल्याने शेतकºयांनी सावकारांचे उंबरठे झिजवत कर्ज काढुन हंगामी पिकांची पेरणी केली.परंतु पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात पावसाचे लवकर आगमन न झाल्यास हजारो हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकºयांवर येणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे बळीराजा व्यथीत झाला आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरagricultureशेतीFarmerशेतकरी